धोकादायक इमारती रिकाम्या करा

पनवेल महापालिकेच्या वतीने धोकादायक इमारतींची यादी जाहीर


पनवेल: पनवेल महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक व धोकादायक इमारतींचे प्रभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात प्रभाग समिती अ- १८, प्रभाग समिती ब-१५, प्रभाग समिती क- १०, प्रभाग समिती ड-३७ अतंर्गत एकूण ८० सी-१ या प्रवर्गात मोडणाऱ्या मिळकती जाहिर करण्यात आलेल्या आहेत. सदर इमारतीतील रहिवाश्यांना त्यांच्या सदनिका रिक्त करण्याकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९च्या कलम २६५ व २६८ नुसार, तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार, सूचना देण्यात आल्या आहेत.



महापालिकेच्या अहवालानुसार, एकूण ८०धोकादायक इमारती असल्याचे निष्पन्न झाले आहे. या इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, अशा इमारतींतील नागरिकांनी तातडीने स्थलांतर करण्याबाबत महापालिकेच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांनी सूचना दिल्या आहेत. मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच राज्य शासनाने धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याबाबत निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुळ मालक, भोगवटादार यांना पुरेशी संधी देऊनही संबंधितांनी इमारत रिक्त करुन पाडण्याची कार्यवाही केली नाही तर या इमारतीचा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा खंडीत करणे व त्यानुसार या इमारतींवर पोलीसांमार्फत निर्मनुष्य करुन पाडण्याची कार्यवाही मनपामार्फत करण्यात येत आहे. धोकादायक इमारत मालकांनी स्वतःहुन सुरक्षितरित्या पाडण्याची कार्यवाही करावी.


 

धोकादायक इमारत कोसळून काही दुर्घटना घडल्यास व त्यात जिवीत व वित्त हानी झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या संबंधित नागरीकांची तसेच इमारतीचे मालक व भाडेकरु यांची राहील. त्याचप्रमाणे अतिधोकादायक मालमत्तांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याची जबाबदारी संबंधित घरमालक किंवा भोगवटादार यांची राहणार. याकरीता महानगरपालिका जबाबदार राहणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संपूर्ण माहिती www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच नागरिकांनी आपल्या आसपास धोकादायक इमारती असतील तर त्याची
माहिती नजिकच्या प्रभाग अधिकाऱ्यांना द्यावी.


जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये राहू नये व दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अधिक माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०००९ वर तसेच ०२२-७४५८०४०/४१/४२ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन उपायुक्त रविकिरण घोडके यांनी केले आहे.
Comments
Add Comment

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील