गोखले पुलावर शुक्रवारपासून बससेवा

प्रारंभी तीन बसमार्ग धावणार


मुंबई : २०२२ मध्ये बंद करण्यात आलेला गोखले पूल अडीच वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, पूल सुरु होऊन अजूनही बेस्ट बस सेवा यावरून सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना या पुलावरून बस सेवा केव्हा पूर्ववत होणार याची प्रतीक्षा होती. बेस्ट प्रशासनाकडून गोखले पुलावरील बससेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असून, सर्वेक्षणानंतर लवकरच ही बससेवा सुरु करू, असे सांगितले जात होते.अखेर शक्रवार २३ मे पासून बेस्टने, ए ३५९ ए ४२२ व ४२४ हे बसमार्ग पुन्हा गोखले पुलावरून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.




गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर यावरील बस सेवा इतर मार्गानी वळवण्यात आली होती, तर काही बसमार्ग खंडित करण्यात आले होते. तर दुसरा काहीच पर्याय नसल्याने तीन बसमार्ग पूर्णतः बंद करावे लागले होते . हा महत्वाचा पूल बंद केल्याने पूर्व - पश्चिम प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत होते शिवाय वाहतूककोंडीत भर पडली. त्यामुळे आता गोखले पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर बससेवा तात्काळ सुरु करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती.
फेब्रुवारी मध्ये गोखले पुलाची एक मार्गिका खुली झाल्यानंतर सातत्याने स्थानिकांकडून बसमार्ग पूर्ववत करण्याची मागणी सुरु होती . उद्या शनिवार २३ मे पासून बेस्टने ए ४२२- वांद्रे आगार ते विक्रोळी आगार-, ए ३५९ - हिरानंदानी (पवई ) बस स्थानक ते मालवणी आगार व ४२४ - गोरेगांव आगार ते मुलुंड स्थानक (पश्चिम)- असे तीन बस मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हि बससेवा सुरु झाल्याने पूर्व पश्चिम जाणाऱ्या व लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.



मुंबईत अनेक विकासकामांमुळे बेस्टचे बसमार्ग वळवले जातात वा खंडित केले जातात. गोखले पुलाचे काम सुरू झाल्यामुळे या मार्गावरून जाणारे दहा बसमार्ग बंद आहेत. तर काही मार्ग पर्यायी रस्त्याने वळविण्यात आले आहेत.या पुलाच्या पादचारी मार्गाचा भाग २०१८ मध्ये पडला. तेव्हापासून हा पूल बंद करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलैत तीन दिवसांच्या महाराजस्व मोहिमेचे आयोजन

२१ ते २३ जुलैदरम्यान ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत

Mumbai Weather : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई : मुंबईत (Mumbai) आज (22 जून 2026) सकाळपासून जोरदार पावसाला (Rains) सुरुवात झाली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3