गोखले पुलावर शुक्रवारपासून बससेवा

प्रारंभी तीन बसमार्ग धावणार


मुंबई : २०२२ मध्ये बंद करण्यात आलेला गोखले पूल अडीच वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, पूल सुरु होऊन अजूनही बेस्ट बस सेवा यावरून सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना या पुलावरून बस सेवा केव्हा पूर्ववत होणार याची प्रतीक्षा होती. बेस्ट प्रशासनाकडून गोखले पुलावरील बससेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असून, सर्वेक्षणानंतर लवकरच ही बससेवा सुरु करू, असे सांगितले जात होते.अखेर शक्रवार २३ मे पासून बेस्टने, ए ३५९ ए ४२२ व ४२४ हे बसमार्ग पुन्हा गोखले पुलावरून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.




गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर यावरील बस सेवा इतर मार्गानी वळवण्यात आली होती, तर काही बसमार्ग खंडित करण्यात आले होते. तर दुसरा काहीच पर्याय नसल्याने तीन बसमार्ग पूर्णतः बंद करावे लागले होते . हा महत्वाचा पूल बंद केल्याने पूर्व - पश्चिम प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत होते शिवाय वाहतूककोंडीत भर पडली. त्यामुळे आता गोखले पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर बससेवा तात्काळ सुरु करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती.
फेब्रुवारी मध्ये गोखले पुलाची एक मार्गिका खुली झाल्यानंतर सातत्याने स्थानिकांकडून बसमार्ग पूर्ववत करण्याची मागणी सुरु होती . उद्या शनिवार २३ मे पासून बेस्टने ए ४२२- वांद्रे आगार ते विक्रोळी आगार-, ए ३५९ - हिरानंदानी (पवई ) बस स्थानक ते मालवणी आगार व ४२४ - गोरेगांव आगार ते मुलुंड स्थानक (पश्चिम)- असे तीन बस मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हि बससेवा सुरु झाल्याने पूर्व पश्चिम जाणाऱ्या व लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.



मुंबईत अनेक विकासकामांमुळे बेस्टचे बसमार्ग वळवले जातात वा खंडित केले जातात. गोखले पुलाचे काम सुरू झाल्यामुळे या मार्गावरून जाणारे दहा बसमार्ग बंद आहेत. तर काही मार्ग पर्यायी रस्त्याने वळविण्यात आले आहेत.या पुलाच्या पादचारी मार्गाचा भाग २०१८ मध्ये पडला. तेव्हापासून हा पूल बंद करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Local Train News : केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे; मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे आणि

Pratap Sarnaik : आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार. पंढरपूर :- आषाढी यात्रेच्या

BMC News : पुढील वर्षी एप्रिल पर्यंत मिळणार १७० दशलक्ष लिटर पाणी- अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मलनिस्सारण प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत वेगाने पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश मुंबई : समुद्रात

Mumbai-Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प; प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली, अतिरिक्त शिवनेरी बसेस सुरू

मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या

'Dhamaal 4' Movie : 'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; विकेंडला ६० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर 'धमाल 4' (Dhamaal 4) बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट (Hit) ठरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. दुसऱ्या