गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! लवकरच जलवाहतूक सेवा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाचा प्रवास अधिक सुखकर ठरणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंतच्या किनारी मार्गावर जलवाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे.

नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हायटेक बोट सेवा सुरू


मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून माझगावपासून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरी  या मार्गावर प्रवासी बोट सेवा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'एम टू एम' नावाची हायटेक बोट २५ मे रोजी भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे.

अगदी काही तासांत गाठता येणार गाव


जलवाहतूक सेवेच्या माध्यमातून मुंबई ते रत्नागिरी अंतर अवघ्या ३ तासांत, तर मालवण आणि विजयदुर्ग अंतर ४.५ तासांत गाठता येणार आहे. ही सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोकणात जाताना पावसामुळे होणारी गैरसोय, रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतूक कोंडी या त्रासाचा सामना करावा लागत असल्यामुळे चाकरमान्यांना ही जलसेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
Comments
Add Comment

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलैत तीन दिवसांच्या महाराजस्व मोहिमेचे आयोजन

२१ ते २३ जुलैदरम्यान ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत