गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! लवकरच जलवाहतूक सेवा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाचा प्रवास अधिक सुखकर ठरणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंतच्या किनारी मार्गावर जलवाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे.

नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हायटेक बोट सेवा सुरू


मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून माझगावपासून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरी  या मार्गावर प्रवासी बोट सेवा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'एम टू एम' नावाची हायटेक बोट २५ मे रोजी भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे.

अगदी काही तासांत गाठता येणार गाव


जलवाहतूक सेवेच्या माध्यमातून मुंबई ते रत्नागिरी अंतर अवघ्या ३ तासांत, तर मालवण आणि विजयदुर्ग अंतर ४.५ तासांत गाठता येणार आहे. ही सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोकणात जाताना पावसामुळे होणारी गैरसोय, रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतूक कोंडी या त्रासाचा सामना करावा लागत असल्यामुळे चाकरमान्यांना ही जलसेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
Comments
Add Comment

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी BMC ने केला ७० हजार कोटींचा खर्च, एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने

Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात

Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या