दोन दिवसांच्या वादळी पावसाने २,१२४ घरांची पडझड

मदतीसाठी शासनाकडे मागितला सव्वा कोटींचा निधी


पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ६ व ७ मे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे आठ तालुक्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. पालघर आणि डहाणू तालुक्यातील घरांची जास्त पडझड झाली आहे. पालघर तालुक्यात ५५० तर डहाणू तालुक्यातील ६५२ घरांचे नुकसान झाल्याचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात ६ मे च्या सायंकाळपासूनच वादळी वारा व पावसाने हजेरी लावली. ७ आणि ८ मेला सुद्धा पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडल्याने बहुतांश भाग अंधारात होता. ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.


शेतीपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे घरांचे नुकसान झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी तत्काळ नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली असून महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. वाडा तालुक्यातील ९५ पक्क्या घरांचे तर २८ कच्च्या घरांचे नुकसान झाले असून, वसई तालुक्यात ८७ पक्की घरे, ५५ कच्ची घरे, जव्हार तालुक्यातील २०१ पक्क्या घरांचे मोखाडा तालुक्यातील १२९ पक्की घरे आणि ३० कच्ची घरे, पालघर तालुक्यातील ४४८ कच्ची घरे तर १०२ पक्की घरे, डहाणू तालुक्यातील ५९७ पक्की आणि ५१ कच्ची घरे, विक्रमगड तालुक्यातील १७८ पक्की आणि २८ कच्ची घरे आणि तलासरी तालुक्यातील ७२ पक्क्या घरांचे तर ५५ कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.


वादळी वारा आणि पावसाने जिल्ह्यात २ हजार १२४ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात येईल.
- सुभाष भागडे, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर
Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक