IPL 2025 : मुंबई - दिल्ली सामन्याला पावसाचा धोका

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर आज म्हणजेच बुधवार २१ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना रंगणार आहे. हा यंदाच्या आयपीएलमधील ६३ वा साखळी सामना आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांचा हा तेरावा साखळी सामना आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याचा धोका आहे.


वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात जिंकणाऱ्या संघाला दोन गुण मिळणार आहे. सध्या मुंबईकडे चौदा गुण आहेत तर दिल्लीकडे तेरा गुण आहेत. या परिस्थितीत वानखेडे स्टेडियमवरील सामना जिंकल्यास मुंबई १६ गुण मिळवत लगेच पुढील फेरीत (प्ले ऑफ राउंड) जाईल. पावसामुळे सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत मुंबईला २६ मे रोजी पंजाब विरुद्धचा सामना जिंकून पुढील फेरीसाठी पात्र होण्याची एक संधी उपलब्ध असेल. दिल्लीला पुढील फेरीत जाण्यासाठी मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांविरुद्ध जिंकणे आवश्यक आहे.


हवामान खात्याने बुधवार २१ मे रोजी मुंबईत संध्याकाळी सहा ते सात दरम्यान पावसाची सोळा टक्के शक्यता वर्तवली आहे. तसेच संध्याकाळी सात ते रात्री अकरा दरम्यान पावसाची शक्यता फक्त सात ते आठ टक्के वर्तवली आहे. बीसीसीआयने पावसाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या नियमांत बदल केला आहे. याआधी आयपीएलच्या साखळी सामन्यांच्या फेरीत (लीग मॅच राउंड) पावसामुळे एक तास वाया गेला तर षटकांमध्ये कपात केली जात होती. नव्या नियमानुसार पावसामुळे दोन तास वाया गेले तरच षटकांमध्ये कपात केली जाणार आहे. नाही तर ठरल्याप्रमाणे २० षटकांचा सामना होईल.


मुंबई इंडियन्सचे शेवटचे दोन साखळी सामने


बुधवार २१ मे २०२५ - वानखेडे स्टेडियम, मुंबई - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
सोमवार २६ मे २०२५ - सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर - पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स


दिल्ली कॅपिटल्सचे शेवटचे दोन साखळी सामने


बुधवार २१ मे २०२५ - वानखेडे स्टेडियम, मुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
शनिवार २४ मे २०२५ - सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर - पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

Comments
Add Comment

IND vs WI: कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, केएल राहुल आणि गिल मैदानावर

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे.

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला