IPL 2025 : मुंबई - दिल्ली सामन्याला पावसाचा धोका

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर आज म्हणजेच बुधवार २१ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना रंगणार आहे. हा यंदाच्या आयपीएलमधील ६३ वा साखळी सामना आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांचा हा तेरावा साखळी सामना आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याचा धोका आहे.


वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात जिंकणाऱ्या संघाला दोन गुण मिळणार आहे. सध्या मुंबईकडे चौदा गुण आहेत तर दिल्लीकडे तेरा गुण आहेत. या परिस्थितीत वानखेडे स्टेडियमवरील सामना जिंकल्यास मुंबई १६ गुण मिळवत लगेच पुढील फेरीत (प्ले ऑफ राउंड) जाईल. पावसामुळे सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत मुंबईला २६ मे रोजी पंजाब विरुद्धचा सामना जिंकून पुढील फेरीसाठी पात्र होण्याची एक संधी उपलब्ध असेल. दिल्लीला पुढील फेरीत जाण्यासाठी मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांविरुद्ध जिंकणे आवश्यक आहे.


हवामान खात्याने बुधवार २१ मे रोजी मुंबईत संध्याकाळी सहा ते सात दरम्यान पावसाची सोळा टक्के शक्यता वर्तवली आहे. तसेच संध्याकाळी सात ते रात्री अकरा दरम्यान पावसाची शक्यता फक्त सात ते आठ टक्के वर्तवली आहे. बीसीसीआयने पावसाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या नियमांत बदल केला आहे. याआधी आयपीएलच्या साखळी सामन्यांच्या फेरीत (लीग मॅच राउंड) पावसामुळे एक तास वाया गेला तर षटकांमध्ये कपात केली जात होती. नव्या नियमानुसार पावसामुळे दोन तास वाया गेले तरच षटकांमध्ये कपात केली जाणार आहे. नाही तर ठरल्याप्रमाणे २० षटकांचा सामना होईल.


मुंबई इंडियन्सचे शेवटचे दोन साखळी सामने


बुधवार २१ मे २०२५ - वानखेडे स्टेडियम, मुंबई - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
सोमवार २६ मे २०२५ - सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर - पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स


दिल्ली कॅपिटल्सचे शेवटचे दोन साखळी सामने


बुधवार २१ मे २०२५ - वानखेडे स्टेडियम, मुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
शनिवार २४ मे २०२५ - सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर - पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

Comments
Add Comment

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय! ५३ धावांनी भारताने गाठले उपांत्य फेरीत स्थान

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

२०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी अभिनव बिंद्रा मशालवाहक

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या २०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची मशालवाहक

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेड ODI जिंकली

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला.

BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला बढती

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) इतिहासात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या सेवेनंतर महिला हवालदाराला (लेडी

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसह तळाचे फलंदाज चमकले; भारताने ऑस्ट्रेलियापुढे ठेवले एवढे मोठे आव्हान

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पर्थमध्ये झालेला