IPL 2025:  कोलकाता नव्हे तर येथे रंगणार आयपीएलचा फायनल सामना, प्लेऑफ़च्या सामन्यांचीही ठिकाणे बदलली

  73

मुंबई: इंडियन प्रीमीयर लीगच्या फायनल सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलचा अंतिम सामना आता नव्या वेळापत्रकानुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अनेक बैठकांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.


दरम्यान, प्लेऑफचे पहिले दोन सामने क्वालिफ़ायर १ आणि एलिमिनेटर अनुक्रमे २९ मे आणि ३० मेला मुल्लांपूर, न्यू चंदीगड येथे खेळवले जाऊ शकतात. या ठिकाणांना निवडण्यामागे बीसीसीआयसाठी प्राथमिक विचार होता हवामानाची स्थिती. देशात हळू हळू मान्सूनला सुरूवात होत आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार आयपीएल २०२५चा फायनल सामना कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये रंगणार होता. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावांमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. यानंतर १७ मे पासून पुन्हा या लीगची सुरूवात झाली होती. याच कारणामुळे बीसीसीआयलाही वेळापत्रकात बदल करावा लागला होता. फायनलचा सामना आता २५ मेच्या जागी ३ जूनला खेळवला जाईल.



आयपीएलचे वेळापत्रक


क्वालिफ़ायर १- २९ मे मुल्लांपूर, न्यू चंदीगड


एलिमिनेटर - ३० मे मुल्लांपूर, न्यू चंदीगड


क्वालिफ़ायर २ - १ जून, अहमदाबाद


फायनल - ३ जून, अहमदाबाद

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र