छत्तीसगड : २७ नक्षलवादी ठार, चार जिल्ह्यांत नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझहमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात चकमक सुरू आहे. आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत.


सुरक्षा पथकांकडून यावेळी जिल्हा राखीव रक्षक हे नक्षलवाद्यांविरुद्धच्या चकमकीत आघाडीवर आहेत. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. अनेक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरक्षा पथकांना नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी मार्गदर्शन करत आहेत. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या ताज्या कारवाईत नक्षलवादी रुपेश आणि आणखी काही नक्षलवाद्यांचे नेते यांना सुरक्षा पथकांनी घेरले आहे.


नक्षलवाद्यांच्या सामर्थ्याचा बीमोड करण्यासाठी व्यापक कारवाई सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा पथकांकडील एक जवान जखमी झाला आणि एक जण हुतात्मा झाला.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू