मुंबई-गोवा महामार्गाचे कोलाड परिसरात काम संथगतीने सुरू

कोलाडमधील वाहतूक कोंडीमुळे व्यापारी त्रस्त, नागरिकांमध्ये संताप


कोलाड : मुंबई-गोवा महामार्गाचे (NH-६६) काम कोलाड परिसरात अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून स्थानिक व्यापाऱ्यांना, दुकानदारांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोलाड गाव हे रोहा व पेण दरम्यान एक महत्त्वाचे स्थान असून येथे अनेक दुकाने, पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि उद्योगधंदे आहेत; परंतु सध्या चालू असलेले महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी अर्धवट उघडलेले रस्ते, खड्डे, अपूर्ण पुलांची कामे आणि दिशाहीन वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांची संख्याही घटली आहे.



स्थानिक दुकानदारांनी सांगितले की,"रस्त्यावरील धूळ, गोंधळ आणि वाहतूक कोंडीमुळे ग्राहक दुकानात येणे टाळतात. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक दुकानदारांनी कर्ज काढून व्यवसाय उभा केला आहे, पण आता त्यांनी अडचणीत येण्याची वेळ आली आहे." महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका देखील प्रश्नचिन्हाखाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, पण अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. सध्या येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि संबंधित ठेकेदारांकडे त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहतूक नियंत्रित करणारे पोलिस, मार्गदर्शक फलक, पर्यायी मार्ग यांचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य जनतेला सहनशक्तीच्या बाहेरचा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कोलाडमधील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल थांबवावेत, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले