मुंबई-गोवा महामार्गाचे कोलाड परिसरात काम संथगतीने सुरू

कोलाडमधील वाहतूक कोंडीमुळे व्यापारी त्रस्त, नागरिकांमध्ये संताप


कोलाड : मुंबई-गोवा महामार्गाचे (NH-६६) काम कोलाड परिसरात अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून स्थानिक व्यापाऱ्यांना, दुकानदारांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोलाड गाव हे रोहा व पेण दरम्यान एक महत्त्वाचे स्थान असून येथे अनेक दुकाने, पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि उद्योगधंदे आहेत; परंतु सध्या चालू असलेले महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी अर्धवट उघडलेले रस्ते, खड्डे, अपूर्ण पुलांची कामे आणि दिशाहीन वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांची संख्याही घटली आहे.



स्थानिक दुकानदारांनी सांगितले की,"रस्त्यावरील धूळ, गोंधळ आणि वाहतूक कोंडीमुळे ग्राहक दुकानात येणे टाळतात. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक दुकानदारांनी कर्ज काढून व्यवसाय उभा केला आहे, पण आता त्यांनी अडचणीत येण्याची वेळ आली आहे." महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका देखील प्रश्नचिन्हाखाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, पण अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. सध्या येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि संबंधित ठेकेदारांकडे त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहतूक नियंत्रित करणारे पोलिस, मार्गदर्शक फलक, पर्यायी मार्ग यांचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य जनतेला सहनशक्तीच्या बाहेरचा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कोलाडमधील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल थांबवावेत, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी