मुंबई-गोवा महामार्गाचे कोलाड परिसरात काम संथगतीने सुरू

कोलाडमधील वाहतूक कोंडीमुळे व्यापारी त्रस्त, नागरिकांमध्ये संताप


कोलाड : मुंबई-गोवा महामार्गाचे (NH-६६) काम कोलाड परिसरात अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून स्थानिक व्यापाऱ्यांना, दुकानदारांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोलाड गाव हे रोहा व पेण दरम्यान एक महत्त्वाचे स्थान असून येथे अनेक दुकाने, पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि उद्योगधंदे आहेत; परंतु सध्या चालू असलेले महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी अर्धवट उघडलेले रस्ते, खड्डे, अपूर्ण पुलांची कामे आणि दिशाहीन वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांची संख्याही घटली आहे.



स्थानिक दुकानदारांनी सांगितले की,"रस्त्यावरील धूळ, गोंधळ आणि वाहतूक कोंडीमुळे ग्राहक दुकानात येणे टाळतात. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक दुकानदारांनी कर्ज काढून व्यवसाय उभा केला आहे, पण आता त्यांनी अडचणीत येण्याची वेळ आली आहे." महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका देखील प्रश्नचिन्हाखाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, पण अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. सध्या येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि संबंधित ठेकेदारांकडे त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहतूक नियंत्रित करणारे पोलिस, मार्गदर्शक फलक, पर्यायी मार्ग यांचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य जनतेला सहनशक्तीच्या बाहेरचा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कोलाडमधील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल थांबवावेत, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने