मुंबई-गोवा महामार्गाचे कोलाड परिसरात काम संथगतीने सुरू

कोलाडमधील वाहतूक कोंडीमुळे व्यापारी त्रस्त, नागरिकांमध्ये संताप


कोलाड : मुंबई-गोवा महामार्गाचे (NH-६६) काम कोलाड परिसरात अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून स्थानिक व्यापाऱ्यांना, दुकानदारांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोलाड गाव हे रोहा व पेण दरम्यान एक महत्त्वाचे स्थान असून येथे अनेक दुकाने, पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि उद्योगधंदे आहेत; परंतु सध्या चालू असलेले महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी अर्धवट उघडलेले रस्ते, खड्डे, अपूर्ण पुलांची कामे आणि दिशाहीन वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांची संख्याही घटली आहे.



स्थानिक दुकानदारांनी सांगितले की,"रस्त्यावरील धूळ, गोंधळ आणि वाहतूक कोंडीमुळे ग्राहक दुकानात येणे टाळतात. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक दुकानदारांनी कर्ज काढून व्यवसाय उभा केला आहे, पण आता त्यांनी अडचणीत येण्याची वेळ आली आहे." महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका देखील प्रश्नचिन्हाखाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, पण अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. सध्या येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि संबंधित ठेकेदारांकडे त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहतूक नियंत्रित करणारे पोलिस, मार्गदर्शक फलक, पर्यायी मार्ग यांचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य जनतेला सहनशक्तीच्या बाहेरचा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कोलाडमधील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल थांबवावेत, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग