Lychee : लिची खाण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत लिची खाण्याचे फायदे

  91

मुंबई : लिची हे फळ गोड आणि रसाळ असते. मुले असोत किंवा वृद्ध, सर्वांनाच लिची आवडते. यामध्ये 82 % टक्के पाणी असते जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. हे फळ खाल्याने तुमच्या आरोग्यास तसेच त्वचेस फायदे होतात. कारण यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, प्रथिने, फायबर असे पोषक घटक असतात. लिचीमध्ये कमी कॅलरीज आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो. लिची खाल्याने काय फायदे होतात आणि ती कधी खायची ते पाहूया



खाण्याची योग्य वेळ


खरंतर लिची खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते कारण त्यात आवश्यक पोषक तत्वे असतात जी त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात. त्यामुळे लिची योग्य वेळी खाल्ली तरच फायदेशीर ठरते, अन्यथा त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.



लिची खाण्याची योग्य वेळ कोणती?


बरेच लोकं रिकाम्या पोटी लिची खातात, पण रिकाम्या पोटी ती खाल्ल्याने तुमच्या शरीराला पूर्ण पोषक तत्वे मिळत नाहीत. तज्ज्ञांच्या मते सकाळी नाश्त्यानंतर 1 तासाने किंवा दुपारी जेवणाच्या 1-2 तास आधी लिची खावी. यामुळे लिची खाण्याचे फायदे दुप्पट होतात आणि त्याचा आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.




किती लीची खावी?


गोड, रसाळ आणि लाल रंगाची लिची चवीला चविष्ट असते. म्हणूनच काही लोकांना ती इतकी आवडते की ते ते मोठ्या प्रमाणात खातात. पण अधिक प्रमाणात लिचीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, आम्लता आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्या उद्भवतात आणि पचनसंस्था कमकुवत होते. म्हणून, एका दिवसात 10-15 पेक्षा जास्त लिची खाऊ नयेत.



लिची खाण्याचे फायदे


लिचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेजन वाढवतात आणि सुरकुत्या, मुरुमे, काळे डाग यासारख्या त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यास मदत करतात. त्वचा मऊ आणि गुळगुळीत करते.


पचनसंस्था निरोगी ठेवते


लिचीमध्ये अनेक पोषक घटक असले तरी, त्यापैकी एक म्हणजे फायबर. फायबरचे कार्य पचन सुधारणे आहे. ज्यामुळे आपल्याला अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या येत नाहीत.


वजन कमी करण्यास मदत करते


लिचीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते जे चयापचय वाढवते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते. वजन कमी करू इच्छिणारे लोकं निरोगी नाश्ता म्हणून लिचीचे सेवन करू शकतात.


रोगप्रतिकारक शक्ती वाढते


लिचीमध्ये अनेक पोषक घटक असतात जसे की त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. हे शरीराला गंभीर आजारांशी लढण्याची ताकद देते आणि शरीर तंदुरुस्त ठेवते.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे