मुंबई-गोवा महामार्गासाठी निधी उपलब्ध करून देणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी दरम्यान दिले आश्वासन


अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रायगडमधील महामार्गाच्या कामाची हवाईसह प्रत्यक्ष पाहणी करून काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला, त्याचबरोबर महामार्गावरील अपूर्ण पूल, बाह्य वळणे आणि सर्विस रोडची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले, तसेच या महामार्गासंदर्भात मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन ज्या कामांसाठी निधी उपलब्ध होऊ शकत नाही, त्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.


माणगावच्या आनंद भुवन सभागृहात मुंबई-गोवा महामार्ग आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून ते महाडपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचा आढावा त्यांनी घेतला. माणगाव व इंदापूर येथील वाहतूक कोंडी विषयावर सविस्तर चर्चाही करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामामध्ये होणाऱ्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली. नागरिकांना सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहॆ.



या कामांचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही दिले. माणगाव येथील बायपास तातडीने पूर्ण होणार नाही हे खरे आहे; परंतु इंदापूर ते कशेणे कालवा रोड पर्यायी मार्ग, तसेच माणगाव शहरातील मोर्बा रोड, कालवा मार्ग ते मुंबई-गोवा महामार्ग असा पर्यायी मार्ग उपलब्ध करता येऊ शकतो. साईनगर कालवा मार्ग, भादाव ते विंचवली हा मार्ग झाल्यास कायमस्वरूपी वाहतूक कोंडीतून सुटका होईल.पर्यायी मार्गांसाठी केंद्र सरकारने मदत न केल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तत्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अशा सुचनाही पवार यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिल्या.


इंदापूर-माणगाव बायपासचे टेंडर निघाले आहे; परंतु लोणेरे येथील महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय बायपासचे काम करणाऱ्या नवीन कंत्राटदाराला वर्कऑर्डर देता येणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत देताच त्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील असेही पवार यांनी उत्तरात सांगितले. मुंबई-गोवा महामार्गालगत अनेक छोटी-मोठी गावे आहेत. तेथील नागरिक महामार्गावरून प्रवास करीत असतात. त्या नागरिकांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात यावे असे आदेश पावार यांनी यावेळी दिले.


खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी या महामार्गाच्या कामाच्या अनुषंगाने काही सुचना केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होत्या.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग