CSK vs RR, IPL 2025: चेन्नईविरुद्ध विजय मिळवत राजस्थानने शेवट केला गोड

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ६२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला ६ विकेटनी हरवले. हा राजस्थानचा या हंगामातील शेवटचा सामना होता. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात अर्धशतक ठोकले. या विजयासह राजस्थानने आयपीएलचा हा शेवट गोड केला.


या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने १८ षटकांतच पूर्ण केले. वैभव सूर्यवंशीने ५७ धावांची धमाकेदार खेळी केली


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या चेन्नईची सुरूवात खराब राहिली. दुसऱ्याच षटकांत कॉन्वेला युद्धवीरने बाद केले. यानंतर याच घटकांत उर्विल पटेललाही बाद केले. मात्र यानंतर आयुष म्हात्रेने जबरदस्त फलंदाजी केली. म्हात्रेने २० बॉलमध्ये ४३ धावांची खेळी केली. यानंतर सहाव्या षटकांत त्याची विकेट पडली. यानंतर पुढच्याच षटकांत अश्विनही बाद झाला. अश्विनने १३ धावा केल्या. यानंतर रवींद्र जडेजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र जडेजाही लवकर बाद झाला. यानंतर ब्रेविस आणि दुबेने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. १० षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ५ बाद १०३ होती. दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. १४व्या षटकांत ब्रेविस ४२ धावा करून बाद झाला. यातच धोनी आणि शिवम दुबेमध्ये चांगली भागीदारी झाली. यातच धोनीने टी-२०मध्ये ३५० षटकारही पूर्ण केले.


Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून