CSK vs RR, IPL 2025: चेन्नईविरुद्ध विजय मिळवत राजस्थानने शेवट केला गोड

  76

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ६२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला ६ विकेटनी हरवले. हा राजस्थानचा या हंगामातील शेवटचा सामना होता. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात अर्धशतक ठोकले. या विजयासह राजस्थानने आयपीएलचा हा शेवट गोड केला.


या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने १८ षटकांतच पूर्ण केले. वैभव सूर्यवंशीने ५७ धावांची धमाकेदार खेळी केली


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या चेन्नईची सुरूवात खराब राहिली. दुसऱ्याच षटकांत कॉन्वेला युद्धवीरने बाद केले. यानंतर याच घटकांत उर्विल पटेललाही बाद केले. मात्र यानंतर आयुष म्हात्रेने जबरदस्त फलंदाजी केली. म्हात्रेने २० बॉलमध्ये ४३ धावांची खेळी केली. यानंतर सहाव्या षटकांत त्याची विकेट पडली. यानंतर पुढच्याच षटकांत अश्विनही बाद झाला. अश्विनने १३ धावा केल्या. यानंतर रवींद्र जडेजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र जडेजाही लवकर बाद झाला. यानंतर ब्रेविस आणि दुबेने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. १० षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ५ बाद १०३ होती. दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. १४व्या षटकांत ब्रेविस ४२ धावा करून बाद झाला. यातच धोनी आणि शिवम दुबेमध्ये चांगली भागीदारी झाली. यातच धोनीने टी-२०मध्ये ३५० षटकारही पूर्ण केले.


Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र