CSK vs RR, IPL 2025: चेन्नईविरुद्ध विजय मिळवत राजस्थानने शेवट केला गोड

  48

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ६२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला ६ विकेटनी हरवले. हा राजस्थानचा या हंगामातील शेवटचा सामना होता. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात अर्धशतक ठोकले. या विजयासह राजस्थानने आयपीएलचा हा शेवट गोड केला.


या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने १८ षटकांतच पूर्ण केले. वैभव सूर्यवंशीने ५७ धावांची धमाकेदार खेळी केली


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या चेन्नईची सुरूवात खराब राहिली. दुसऱ्याच षटकांत कॉन्वेला युद्धवीरने बाद केले. यानंतर याच घटकांत उर्विल पटेललाही बाद केले. मात्र यानंतर आयुष म्हात्रेने जबरदस्त फलंदाजी केली. म्हात्रेने २० बॉलमध्ये ४३ धावांची खेळी केली. यानंतर सहाव्या षटकांत त्याची विकेट पडली. यानंतर पुढच्याच षटकांत अश्विनही बाद झाला. अश्विनने १३ धावा केल्या. यानंतर रवींद्र जडेजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र जडेजाही लवकर बाद झाला. यानंतर ब्रेविस आणि दुबेने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. १० षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ५ बाद १०३ होती. दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. १४व्या षटकांत ब्रेविस ४२ धावा करून बाद झाला. यातच धोनी आणि शिवम दुबेमध्ये चांगली भागीदारी झाली. यातच धोनीने टी-२०मध्ये ३५० षटकारही पूर्ण केले.


Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी