LSG vs SRH, IPL 2025: लखनऊ सुपर जायंट्सला विजय आवश्यक

मुंबई(सुशील परब): आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदरावाद हा सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे ११ सामन्यांत दहा गुण झाले असून त्यांचे अजून तीन सामने वाकी आहेत. गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्स सातव्या क्रमांकावर व सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहेत.


लखनऊ सुपर जायंट्सला तीनही सामने जिंकले, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा आहे. त्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागेल. सनरायझर्स हैदरावाद प्लेऑफमधून अगोदरच बाहेर झाली आहे. ते लखनऊ सुपर जायंट्सला हरवण्याचा प्रयत्न करतील. लखनऊ सुपर जायंट्स हा सामना हरले, तर ते पण प्लेऑफमधून बाहेर होतील.


मागील सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला हरविले होते त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. ऋषभ पंत कर्णधार, निकोलस पुरन, मीचेल मार्श, एडन मार्कम, हे फलंदाजी सांभाळतील शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाशदीप हे गोलंदाजीचा भार सांभाळतील. सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी, अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी हे सांभाळतील, तर कर्णधार पेंट कमिन्स, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, जयदेव उनादकट हे गोलंदाजीचा भार सांभाळतील, तर पाहूया लखनऊ सुपर जायंट्स सनरायझर्स हैदराबादला हरवून प्लेऑफच्या दिशेने घौडदौड करतील का?

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत