Crime News: किरकोळ कारणांवरून काढले कोयते! दहिसरमध्ये दोन कुटुंबांत तुफान हाणामारी; ३ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

मुंबई: दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर झोपडपट्टीत रविवारी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला या मध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, राम गुप्ता (५०) यांच्या नारळ विक्रीच्या स्टॉलजवळ हमीद शेख (४९) मद्यधुंद अवस्थेत आले आणि किरकोळ वाद झाला. वाद लवकरच हिंसक वळणावर गेला आणि दोन्ही कुटुंबांचे सदस्य एकमेकांवर तुटून पडले. या वादात राम गुप्ता, त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता (२३) आणि हमीद शेख गंभीर जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या वादात अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख हे चार जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमएचबी पोलिसांनी परस्परविरोधी खुनाचे गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, गुप्ता आणि शेख कुटुंबांमध्ये मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. जुन्या वैरातूनच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

The Epstein Files : डोनाल्ड ट्रम्पच्या आरोपांशी संबंधित रेकॉर्ड रोखल्याबद्दल एफबीआय चौकशी करणार

अमेरिकेचा न्याय विभाग जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित असलेली काही कागदपत्रे चुकवून सार्वजनिक होण्यापासून

Bigg Boss Marathi : राकेश बापटने तन्वीला केलं किस; राखी सावंत भडकली आणि ....

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंत आल्यापासून रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळतो. राखी सावंतची

Rashmika Vijay Wedding रश्मिकाला मंगळसूत्र घालताना थरथरले विजयचे हात, म्हणाला, "तिला काहीच वाटत नव्हतं, पण मी मात्र

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी, म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय