Crime News: किरकोळ कारणांवरून काढले कोयते! दहिसरमध्ये दोन कुटुंबांत तुफान हाणामारी; ३ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

  43

मुंबई: दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर झोपडपट्टीत रविवारी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला या मध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, राम गुप्ता (५०) यांच्या नारळ विक्रीच्या स्टॉलजवळ हमीद शेख (४९) मद्यधुंद अवस्थेत आले आणि किरकोळ वाद झाला. वाद लवकरच हिंसक वळणावर गेला आणि दोन्ही कुटुंबांचे सदस्य एकमेकांवर तुटून पडले. या वादात राम गुप्ता, त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता (२३) आणि हमीद शेख गंभीर जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या वादात अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख हे चार जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमएचबी पोलिसांनी परस्परविरोधी खुनाचे गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, गुप्ता आणि शेख कुटुंबांमध्ये मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. जुन्या वैरातूनच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या

घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

आणखी एका गर्दीने घेतले नाहक जीव! मरण खरंच स्वस्त झालंय का?

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय.

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.