Crime News: किरकोळ कारणांवरून काढले कोयते! दहिसरमध्ये दोन कुटुंबांत तुफान हाणामारी; ३ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

मुंबई: दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर झोपडपट्टीत रविवारी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला या मध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, राम गुप्ता (५०) यांच्या नारळ विक्रीच्या स्टॉलजवळ हमीद शेख (४९) मद्यधुंद अवस्थेत आले आणि किरकोळ वाद झाला. वाद लवकरच हिंसक वळणावर गेला आणि दोन्ही कुटुंबांचे सदस्य एकमेकांवर तुटून पडले. या वादात राम गुप्ता, त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता (२३) आणि हमीद शेख गंभीर जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या वादात अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख हे चार जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमएचबी पोलिसांनी परस्परविरोधी खुनाचे गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, गुप्ता आणि शेख कुटुंबांमध्ये मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. जुन्या वैरातूनच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत