भाईंदर, मिरारोड रेल्वे स्थानकाची प्रलंबित कामे पूर्ण करा

खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना



ठाणे : खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी भाईंदर आणि मिरारोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच काही कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करावीत असे निर्देश दिले. मिरारोड आणि भाईंदर रेल्वे स्टेशनवरील प्रलंबित कामांसंदर्भात डीआरएम पंकज सिंग आणि वेस्टर्नचे जीएम अशोक मिश्रा यांच्याबरोबर खासदार नरेश म्हस्के हे शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आणि उत्तर भारतीय नेते विक्रम प्रताप सिंग यांच्यासमवेत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. ती कामे आता जलदगतीने सुरू झाल्याबद्द्ल खासदार नरेश म्हस्के यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान समाधान व्यक्त केले.
खासदार नरेश म्हस्के यांनी प्रथम भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागाला भेट दिली. एक्सलेटर व छताच्या कामाची पाहणी केली. स्वछतागृहाची समस्या तसेच काही कामांसंदर्भात अडचणी, कामांना उशीर केला होत असल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी डीआरएम यांच्याशी मोबाईल वरुन संवाद साधत कामे लवकर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.


खासदार नरेश म्हस्के यांनी पूर्ण रेल्वे स्टेशनची पाहणी केली. दोन्ही बाजूची पार्किंगची समस्या जाणून घेतली. प्रवाशांशी चर्चा केली. तृतीयपंथी व्यक्ती आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्यांपासून महिलांना जो त्रास होत आहे याबाबत पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी चर्चा केली. तसेच रेल्वे पोलिस यांनाही फैलावर घेऊन दोघांनी एकमेकाच्या सहकार्याने प्रवाशांच्या समस्या दूर करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. खासदार नरेश म्हस्के यांनी भाईंदर ते मीरारोड रेल्वेने प्रवास करून प्रवाशांशी चर्चा केली. मिरारोड रेल्वे स्टेशनला येऊन तेथील पाहणी केली. अचानकपणे या ठिकाणच्या टॉयलेटची पाहणी करून खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. या कामाबद्दल मिरा रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर नरेश प्रसाद यांचा यावेळी सत्कार केला.


खासदार नरेश म्हस्के यांनी पूर्ण स्टेशनची पाहणी केली आणि सर्वसंबंधित अधिकारी, प्रकल्प अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, अभियंते, दोन्ही स्टेशनला जबाबदार असणारे अधिकारी आणि स्टेशन मास्टर यांच्यासमवेत बैठक आयोजित करून तातडीचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी निर्देश दिले. लोकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील या संदर्भात त्यांना सूचना केल्या. राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याना भाईंदर आणि मीरा रोड स्टेशन येथे थांबा मिळावा अशी येथील प्रवाशांची मागणी असून या मागणीचा विचार करण्याची सुचना यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली.


यावेळी एजीएम अनिल करवंदे, डीईई एमआरव्हीसी विनेशकुमार शर्मा, भाईंदर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर भारती राजविर, उप अभियंता राजकुमार शर्मा, आरपीएफ पीआय परीमल वानखेडे, मिरारोड स्टेसन मास्टर नरेश प्रसाद, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, भाईंदर विधानसभा शहरप्रमुख विक्रम प्रताप सिंग, उपजिल्हाप्रमुख जयराम मेसे, उत्तर भारतीय जिल्हाप्रमुख विद्याशंकर चतुर्वेदी, राजस्थान सेल जिल्हाप्रमुख कपिल परमार, उपजिल्हाप्रमुख रामभुवन शर्मा, उपशहरप्रमुख जावेद शेख, शाखाप्रमुख महेश शिंदे व अंकित शहा, उपशहरप्रमुख उबेद शेख व सतिश सिंग, जिल्हा सचिव सुभाष यादव, विभागप्रमुख इम्रान खलिफा, माजी नगरसेविका शर्मिला बगात्री, उपशहरप्रमुख संकेत पाटील, शाखाप्रमुख समीर खान आणि शॉन इतूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचे आडाखे बांधून काँग्रेसची देशद्रोही मानसिकता उघडी पडली!

देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी काँग्रेसवर शिंदेंची सडकून टीका ठाणे : अमेरिकेचे

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या