खेळता खेळता कारमध्ये बसली मुले आणि अचानक लॉक झाला दरवाजा, जीव गुदमरून ४ चिमुकल्यांचा मृत्यू

  102

अमरावती: आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरील जिल्ह्याच्या द्वारापुडी गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक झाल्याने ४ चिमुकल्यांचा जीव गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना गावातील महिला मंडळाच्या कार्यालयाजवळ घडली. यावेळी ही मुले येथील एका कारमध्ये बसून खेळत होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे वय ६ ते ८ वर्षे इतके होते. ते एका कौटुंबिक लग्न सोहळ्यात सामील होण्यासाठी आले होते. यादरम्यान मुले खेळत होती आणि खेळता खेळता ती कारमध्ये जाऊन बसली. चुकून गाडीचा दरवाजा लॉक झाला. बाहेर याचा कोणाला अंदाजच नव्हता. मात्र जेव्हा समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.


एमएसएमई मंत्री कोण्डापल्ली श्रीनिवास यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त करताना म्हटले, लग्न समारंभात सामील होण्यासाठी आलेले कुटुंबातील ही मुले खेळत होती. त्यावेळी एका बेवारस कारमध्ये ही मुले घुसली. मात्र दरवाजा आतून लॉक झाला. बऱ्याच वेळानंतर कुटुंबियांना या घटनेबाबत समजले मात्र तोपर्यंत चारही मुला-मुलींचा मृत्यू झाला होता.


या घटनेने त्या चिमुकल्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचे हसते खेळते वातावरण या घटनेने पूर्ण बदलून गेले आहे. संपूर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )