खेळता खेळता कारमध्ये बसली मुले आणि अचानक लॉक झाला दरवाजा, जीव गुदमरून ४ चिमुकल्यांचा मृत्यू

अमरावती: आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरील जिल्ह्याच्या द्वारापुडी गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक झाल्याने ४ चिमुकल्यांचा जीव गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना गावातील महिला मंडळाच्या कार्यालयाजवळ घडली. यावेळी ही मुले येथील एका कारमध्ये बसून खेळत होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे वय ६ ते ८ वर्षे इतके होते. ते एका कौटुंबिक लग्न सोहळ्यात सामील होण्यासाठी आले होते. यादरम्यान मुले खेळत होती आणि खेळता खेळता ती कारमध्ये जाऊन बसली. चुकून गाडीचा दरवाजा लॉक झाला. बाहेर याचा कोणाला अंदाजच नव्हता. मात्र जेव्हा समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.


एमएसएमई मंत्री कोण्डापल्ली श्रीनिवास यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त करताना म्हटले, लग्न समारंभात सामील होण्यासाठी आलेले कुटुंबातील ही मुले खेळत होती. त्यावेळी एका बेवारस कारमध्ये ही मुले घुसली. मात्र दरवाजा आतून लॉक झाला. बऱ्याच वेळानंतर कुटुंबियांना या घटनेबाबत समजले मात्र तोपर्यंत चारही मुला-मुलींचा मृत्यू झाला होता.


या घटनेने त्या चिमुकल्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचे हसते खेळते वातावरण या घटनेने पूर्ण बदलून गेले आहे. संपूर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन