खेळता खेळता कारमध्ये बसली मुले आणि अचानक लॉक झाला दरवाजा, जीव गुदमरून ४ चिमुकल्यांचा मृत्यू

अमरावती: आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरील जिल्ह्याच्या द्वारापुडी गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक झाल्याने ४ चिमुकल्यांचा जीव गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना गावातील महिला मंडळाच्या कार्यालयाजवळ घडली. यावेळी ही मुले येथील एका कारमध्ये बसून खेळत होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे वय ६ ते ८ वर्षे इतके होते. ते एका कौटुंबिक लग्न सोहळ्यात सामील होण्यासाठी आले होते. यादरम्यान मुले खेळत होती आणि खेळता खेळता ती कारमध्ये जाऊन बसली. चुकून गाडीचा दरवाजा लॉक झाला. बाहेर याचा कोणाला अंदाजच नव्हता. मात्र जेव्हा समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.


एमएसएमई मंत्री कोण्डापल्ली श्रीनिवास यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त करताना म्हटले, लग्न समारंभात सामील होण्यासाठी आलेले कुटुंबातील ही मुले खेळत होती. त्यावेळी एका बेवारस कारमध्ये ही मुले घुसली. मात्र दरवाजा आतून लॉक झाला. बऱ्याच वेळानंतर कुटुंबियांना या घटनेबाबत समजले मात्र तोपर्यंत चारही मुला-मुलींचा मृत्यू झाला होता.


या घटनेने त्या चिमुकल्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचे हसते खेळते वातावरण या घटनेने पूर्ण बदलून गेले आहे. संपूर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी