RR vs PBKS, IPL 2025: पंजाब मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज पंजाब आणि राजस्थान आमने-सामने भिडणार आहेत. पंजाबला पात्रता फेरीत पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज असून ही एक उत्तम संधी आहे. तसेच पंजाबची फलंदाजी राजस्थानपेक्षा वरचढ आहे. मधल्या फळीत जोश इंग्लिश खेळू शकणार नाही त्याची कमतरता पंजाबला नक्कीच जाणवेल.

पंजाबच्या गोलंदाजीचा भार अर्शदीप सिंह व फिरकी मास्टर युजवेंद्र पहलवर असेल. पंजाबसाठी जमेची बाजू म्हणजे महल मेले तीन हंगाम राजस्थानसाठी खेळत होता. त्याचा अनुभव पंजाबसाठी खूप महत्वाचा आहे. आजचा सामना राजस्थानच्या सवाई मानसिंग मैदानावर होणार आहे. राजस्थानची फलंदाजी कमकुवत असल्यामुळे पंजाबचे ध्येय असेल की, २० षटकात २००-२२० धावांचे लक्ष्य राजस्थान समोर ठेवणे, तसेच पंजाबने राजस्थानला हलक्यात घेऊन चालणार नाही, हा संघ मोक्याच्या क्षणी बाजी मारून जातो.

गुजरात विरुद्ध वैभव सूर्यवंशीने याच मैदानावर शतक ठोकून राजस्थानला विजय मिळवून दिला होता. राजस्थान पात्रता फेरीतून बाहेर गेले आहे तरीपण ते पंजाबला सहज विजय मिळवून देणार नाहीत. रॉयल्सचा स्टार गोलंदाज जॉफा आर्चर खेळणार नसून त्याची जागा कोण भरून काढेल यावर सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. चला तर बघूया पंजाब दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा पात्रता फेरीत जाईल का?
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत