RR vs PBKS, IPL 2025: पंजाब मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेणार का?

  27

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज पंजाब आणि राजस्थान आमने-सामने भिडणार आहेत. पंजाबला पात्रता फेरीत पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज असून ही एक उत्तम संधी आहे. तसेच पंजाबची फलंदाजी राजस्थानपेक्षा वरचढ आहे. मधल्या फळीत जोश इंग्लिश खेळू शकणार नाही त्याची कमतरता पंजाबला नक्कीच जाणवेल.

पंजाबच्या गोलंदाजीचा भार अर्शदीप सिंह व फिरकी मास्टर युजवेंद्र पहलवर असेल. पंजाबसाठी जमेची बाजू म्हणजे महल मेले तीन हंगाम राजस्थानसाठी खेळत होता. त्याचा अनुभव पंजाबसाठी खूप महत्वाचा आहे. आजचा सामना राजस्थानच्या सवाई मानसिंग मैदानावर होणार आहे. राजस्थानची फलंदाजी कमकुवत असल्यामुळे पंजाबचे ध्येय असेल की, २० षटकात २००-२२० धावांचे लक्ष्य राजस्थान समोर ठेवणे, तसेच पंजाबने राजस्थानला हलक्यात घेऊन चालणार नाही, हा संघ मोक्याच्या क्षणी बाजी मारून जातो.

गुजरात विरुद्ध वैभव सूर्यवंशीने याच मैदानावर शतक ठोकून राजस्थानला विजय मिळवून दिला होता. राजस्थान पात्रता फेरीतून बाहेर गेले आहे तरीपण ते पंजाबला सहज विजय मिळवून देणार नाहीत. रॉयल्सचा स्टार गोलंदाज जॉफा आर्चर खेळणार नसून त्याची जागा कोण भरून काढेल यावर सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. चला तर बघूया पंजाब दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा पात्रता फेरीत जाईल का?
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी