पालघर जिल्ह्याला पावसाचा इशारा

पालघर : पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील अरबी समुद्रात, दक्षिण गुजरात-उत्तर कोकण किनाऱ्याजवळ सुमारे १.५ किमी उंचीवर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे आणि २१ मे च्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची संभावना आहे व त्यानंतर, कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून २२ मे पासून उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याने १९ मे ते २५ मे २०२५ दरम्यान महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


१८ ते २० मे २०२५ दरम्यान, बहुतांश जिल्ह्यासह पालघर जिल्हातही काही ठिकाणी विजांसह मेघगर्जना, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहणारे जोरदार वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २१ ते २५ मे दरम्यान मात्र संपूर्ण कोंकणसह पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. वीजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिला असल्याने दामिनी अ‍ॅप्लीकेशनचा वापर करावा. अँन्ड्रॉईड मोबईलवरील गुगल प्ले स्टोअर या अ‍ॅपवर दामिनी अ‍ॅप्लीकेशन सहजरीत्या डाऊनलोड करता येते. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे.


कृषी सल्ला : भात, भुईमूग, परिपक्व फळे व भाजीपालाचे नुकसान होऊ नये म्हणून लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना मातीची भर द्यावे व काठीचा आधार देवून दोरीने बंधावे. जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करा व जनावरांचे शेड कमकुवत असेल, तर डागडुजी करून घ्यावी जेणेकरून नुकसान होणार नाही. हा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे. मच्छीमारांसाठी सल्ला पुढील काही दिवस कोकण आणि गोवा किनाऱ्याजवळ ३५-४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मत्स्य व्यावसायिकांना या काळात समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या