एकता

स्नेहधारा : पूनम राणे


सकाळची वेळ होती. रोहनला खूपच भूक लागली होती. पोटात कावळे ओरडत होते. पाय मात्र काही स्वयंपाक घराकडे वळत नव्हते. हातही ठाण मांडून बसले होते. कान दुर्लक्ष करत होते. तोंड मात्र आतल्या आत पुटपुटत होते.

बहुतेक आज पंचन्द्रियांनी हरताळ करायचा ठरवले होते. मेंदूच्या लक्षात आले, आज काहीतरी नक्कीच बिनसलं. त्यांनी चौकशी केली. तेव्हा तोंड म्हणाले, हे पाहा मेंदू राव, ‘‘इथला प्रत्येक अवयव मीच मोठा म्हणतोय! माझ्यामुळे सर्व होतंय असा प्रत्येकाचा समज आहे. त्यामुळे आज प्रत्येकाने हरताळ करायचे असे ठरवलय.”

हे ऐकून मेंदूला फार वाईट वाटले. तो म्हणाला, ‘‘हे पाहा पोटाला खूप भूक लागलेली आहे. मला भोवळ आल्यासारखी वाटतेय. त्यामुळे थोड्याच वेळात डोळेही बंद होतील. जीव गुदमरायला लागेल आणि हे सर्व शरीर एखाद्या प्रेतासारखं जमिनीवर पडेल. तेव्हा आपल्या प्रत्येकाचे मोठेपण कुठे राहील सांगा बरं!’’

यावर जीभ म्हणाली, ‘‘अरे तू सांगतोस ते मी ऐकून जर बाहेर तोंड उघडलंच नाही, तर दुसऱ्याला कळणार कसे.” त्यामुळे मीच मोठी नाही का? जिभेचे ऐकून कान म्हणाला, हे बघ तू बोलतेस, ते जर मी ऐकलं नाही, तर पुढील सर्वच काम ठप्पच होणार! त्यामुळे मीच श्रेष्ठ! यावर हात म्हणाला, अरे तुम्ही बोललात, ऐकलात पण मी हालचालच केली नाही, तर मग काम कसे होणार ! त्यामुळे मीच श्रेष्ठ!

यावर पाय म्हणाले, ‘‘हे पाहा तुम्हाला जे खायचे आहे, प्यायचे आहे ते घेण्यासाठी दोन पावलं चालावीच लागतात की, पण मी दोन पावलं चाललो नाही, तर ती वस्तू तुम्हाला कशी मिळेल?” त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ!

या सर्वांच्या भांडणात मात्र मेंदूला चक्कर येऊ लागली. सर्व घर त्याच्यासमोर फिरतंय असे वाटू लागले. डोळे गरागरा फिरू लागले. डोळ्यांतून, तोंडातून पाणी येऊ लागले आणि रोहन जमिनीवर आदळला. डोळ्यांतील पाणी येताना पाहून हाताने हलकेच ते पाणी पुसले.” हे पाहून मेंदू हलक्या स्वरात म्हणाला, ‘‘हे पाहा आपल्या सर्वांचेच कार्य एकमेकांवर अवलंबून आहे. यातील एकाने जरी माघार घेतली, तरी या सृष्टीतील प्राणीमात्रांचे काही चालणार नाही. सर्व काही ठप्प होईल.’’ त्यामुळे एकजूट असणे हेच फार महत्त्वाचे असते. हाताची पाच बोटे एकत्र आल्याशिवाय मूठ सुद्धा वळत नाही आणि एका हाताने टाळी केव्हाच वाजत नाही. म्हणतात ना, एकीचे बळ मिळते फळ हेच खरे आहे. एकता हे जीवनमूल्य आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
Comments
Add Comment

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरे पद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती

चिरतरुण...

संवाद ; गुरुनाथ तेंडुलकर अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जग‌द्विख्यात गायिका आशा भोसले

‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’

नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरे पूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची

धीर धरी...

आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानू टीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल? संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच

आत्मप्रतिष्ठेचं भान

स्मृतिपटल; अनिल तोरणे कोणत्याही गोष्टीचा कैफ प्रमाणाबाहेर चढणे केव्हाही अनिष्टच ठरते. गतकाळातील एका

सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक

ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णी माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या