Mud Pot Water : युग रेफ्रिजरेटरचं, अन् क्रेझ माठाची!

तहान भागवणारा, आरोग्य जपणारा माठ आहे गुणकारी


आधीच उन्हाळा, त्यात अवकाळी. त्यामुळे उष्णतेत कमालीची वाढ झालीय. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. घसा कोरडा पडतोय. अशा कोरड्या घशाला थंड पाणी प्यायला मिळाले तर...तर मग सोन्याहून पिवळंच की. आजकाल सर्वांकडे रेफ्रिजरेटर असतात, तरीही माठातलं पाणी पिण्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. मातीच्या भांड्यातील पाण्याचा नेमका काय होतो फायदा आणि माठातील पाणी पिण्याची क्रेझ का वाढतेय, जाणून घेऊया या लेखातून...

ऐन उन्हाळ्यात थंड पाणी पिणं कुणाला आवडणार नाही? फ्रिजमधील थंड पाणी पिऊन तहान शांत केली जाते. त्यातच सर्वांकडे फ्रिज असल्यामुळे थंड पाणी सहज उपलब्ध असतं. असं असलं तरी मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याची क्रेझ वाढतेय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात माठाला मोठी मागणी आहे आणि माठातील पाणी प्यायल्याने समाधानही मिळतं. भारतात माठातील पाणी पिण्याची परंपरा पूर्वापार आहे. माठातील पाणी सहज पचतं. आयुर्वेदातही मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. जर्नल ऑफ इजिप्शियन पब्लिक हेल्थ असोसिएशनने त्याचं महत्त्व स्पष्ट केलंय. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्यापेक्षा मातीच्या भांड्यांमधील साठवलेलं पाणी हे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असतं असं नमूद करण्यात आलंय.


चला तर मग आता पाहूयात मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे



  • उष्माघातापासून संरक्षण करणं

  • हायड्रेशन वाढवणं

  • शरीर डीटॉक्स करणं

  • पचन सुधारणं

  • प्लास्टिकच्या विषापासून दूर ठेवणं

  • शरीराचं तापमान संतुलित ठेवणं

  • असिडिटी आणि गॅस न होणं


आता पाहूयात मातीच्या भांड्यामध्ये पाणी कसं थंड होतं ते. मातीची भांडी अथवा माठ यांना छिद्रं असतात. या छिद्रांतून पाणी भांड्याच्या बाहेर झिरपतं. त्यानंतर त्याच्या बाष्पी भवनाला सुरुवात होते. त्यानंतर पाणी हळूहळू थंड होण्यास सुरुवात होते. त्याचरोबर मातीच्या भांड्यांमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे खनिजे पाण्यात विरघळतात. पाण्याचं भांड किंवा माठ नवीन असेल तर जवळपास १२ तास भिजत ठेवणं महत्त्वाचं असतं. हे सर्व करताना मातीची भांडी स्वच्छ कशी ठेवावीत हेही पाहूयात...


कशी ठेवाल मातीची भाडी सुरक्षित ?


भांडं सावलीच्या ठिकाणी ठेवा, बॅक्टेरिया वाढू नयेत यासाठी नियमित स्वच्छ करा, दररोज शिळे पाणी बदला आणि ताजे भरा, भांडं स्वच्छ करताना साबणाचा वापर टाळा, मातीचं भांडं फ्रिजमधील थंड पाण्याने भरू नका. तुम्हाला तहान भागवायची असेल आणि आरोग्यही जपायचं असेल तर मातीच्या भांड्यातील किंवा माठातील पाणी पिणं गरजेचं आहे. कारण मातीच्या भांड्यातून आपल्याला नैसर्गिक थंडावा मिळत असतो. त्यामुळे आधुनिक युग फ्रिजचं असलं तरी माठाची क्रेज कमी झालेली नाही.
Comments
Add Comment

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

ड्रायव्हरने फरहान अख्तरला घातला १२ लाखांचा गंडा, जाणून घ्या अधिक माहिती...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांच्या ड्रायव्हरने पेट्रोलच्या नावाखाली तब्बल १२ लाखांचा चुना

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल