Ratnagiri Railway : रत्नागिरीतून दिल्लीला जाण्यासाठी दर रविवारी विशेष गाडी!

  82

रत्नागिरी : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन मार्गावर एक विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवारी ही एक दिशा विशेष गाडी तिरुअनंतपुरम येथून सुटली असून रविवारी, १८ मे सकाळी ६ वाजता ती रत्नागिरी स्थानकावर येणार आहे.



गाडी क्रमांक ०६०३३, तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एकमार्गी विशेष रेल्वे


ही विशेष रेल्वे शनिवार, १७ मे २०२५ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सकाळी ०७:३० वाजता सुटली. ती तिसऱ्या दिवशी दुपारी २. ०० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. या गाडीला कोकणात मडगावनंतर रत्नागिरी, रोहा, पनवेल आणि वसई रोड येथे थांबे असतील. रविवारी सकाळी सहा वाजता ही गाडी रत्नागिरी स्थानकातून दिल्लीकडे रवाना होईल. गाडीमध्ये एकूण २४ डब्बे असतील. त्यामध्ये ११ सामान्य डबे, १० शयनयान (स्लीपर), २ वातानुकूलित ३-Tier डबे आणि १ एसएलआर डबा असेल. प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये