Ratnagiri Railway : रत्नागिरीतून दिल्लीला जाण्यासाठी दर रविवारी विशेष गाडी!

रत्नागिरी : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन मार्गावर एक विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवारी ही एक दिशा विशेष गाडी तिरुअनंतपुरम येथून सुटली असून रविवारी, १८ मे सकाळी ६ वाजता ती रत्नागिरी स्थानकावर येणार आहे.



गाडी क्रमांक ०६०३३, तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एकमार्गी विशेष रेल्वे


ही विशेष रेल्वे शनिवार, १७ मे २०२५ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सकाळी ०७:३० वाजता सुटली. ती तिसऱ्या दिवशी दुपारी २. ०० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. या गाडीला कोकणात मडगावनंतर रत्नागिरी, रोहा, पनवेल आणि वसई रोड येथे थांबे असतील. रविवारी सकाळी सहा वाजता ही गाडी रत्नागिरी स्थानकातून दिल्लीकडे रवाना होईल. गाडीमध्ये एकूण २४ डब्बे असतील. त्यामध्ये ११ सामान्य डबे, १० शयनयान (स्लीपर), २ वातानुकूलित ३-Tier डबे आणि १ एसएलआर डबा असेल. प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या