RCB vs KKR: चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पावसाचा कहर, सामना रद्द झाल्यास केकेआर-आरसीबीला किती होणार नुकसान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. मात्र या सामन्याच्या आधी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच हे जाणून घेणे गरजेचे आहे की सामना रद्द झाल्यास कोणाला किती नुकसान होणार आहे...

पाऊस बिघडवणार केकेआरचा खेळ


या सामन्याच्या आधीपासूनच पावसाची शक्यता होती. बंगळुरूमध्ये पावसाची ७० टक्के शक्यता वर्तवण्यात आली होती. चिन्नास्वामी स्टेडियमचे ड्रेनेज सिस्टीम चांगली आहे आणि पाऊस थांबल्यानंतर येथे काही वेळात खेळ सुरू होऊ शकतो. मात्र हवामानाबाबत काहीच सांगता येत नाही.

 



पावसामुळे आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना धुतला गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशातच आरसीबीचे १७ गुण होतील आणि ते प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५च्या प्लेऑफमधून बाहेर जातील. सामना धुतल्यास केकेआरचे १२ गुण होतील आणि शेवटा सामना जिंकल्यास त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील.
Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना