BCCI च्या निर्णयामुळे कोलकाताचे क्रिकेटप्रेमी भडकले

कोलकाता : भारत - पाकिस्तान संघर्षामुळे काही दिवसांसाठी स्थगित केलेली आयपीएल २०२५ ही क्रिकेट स्पर्धा आज म्हणजेच शनिवार १७ मे पासून पुन्हा सुरू होत आहे. आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रंगणार आहे. हा सामना सुरू होण्याआधीच आयपीएलमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. आधीच्या नियोजनानुसार कोलकाता येथे अंतिम सामना होणार होता. पण आता नव्या वेळापत्रकानुसार अंतिम सामना कोलकाता ऐवजी देशातील दुसऱ्या एखाद्या मोठ्या स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी स्टेडियम क्वालिफायर २ आणि अंतिम सामन्यासाठी निवडले आहे. हे दोन्ही सामने अनुक्रमे एक आणि तीन जून रोजी होणार आहेत. यामुळे वादाला तोंड फुटले आहे. कोलकाताचे क्रिकेटप्रेमी अंतिम सामना ईडन गार्डन स्टेडियम येथेच व्हावा यासाठी आग्रही आहेत आणि आंदोलन करत आहेत. बीसीसीआयने अद्याप दोन्ही क्वालिफायर मॅच (पात्रता फेरीचे सामने), एलिमिनेटर (बाद फेरीचा सामना) आणि अंतिम सामना कुठे खेळवणार हे जाहीर केलेले नाही. पण आधीच सामन्यांच्या ठिकाणांवरुन वादाला तोंड फुटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली आणि पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला. आता हा सामना नव्याने २४ मे रोजी खेळवला जाणार आहे. आधी धरमशाला येथे ८ मे रोजी झालेला सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला होता. आता २४ मे रोजी हा सामना जयपूर येथे होणार आहे.
Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित