BCCI च्या निर्णयामुळे कोलकाताचे क्रिकेटप्रेमी भडकले

  39

कोलकाता : भारत - पाकिस्तान संघर्षामुळे काही दिवसांसाठी स्थगित केलेली आयपीएल २०२५ ही क्रिकेट स्पर्धा आज म्हणजेच शनिवार १७ मे पासून पुन्हा सुरू होत आहे. आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रंगणार आहे. हा सामना सुरू होण्याआधीच आयपीएलमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. आधीच्या नियोजनानुसार कोलकाता येथे अंतिम सामना होणार होता. पण आता नव्या वेळापत्रकानुसार अंतिम सामना कोलकाता ऐवजी देशातील दुसऱ्या एखाद्या मोठ्या स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी स्टेडियम क्वालिफायर २ आणि अंतिम सामन्यासाठी निवडले आहे. हे दोन्ही सामने अनुक्रमे एक आणि तीन जून रोजी होणार आहेत. यामुळे वादाला तोंड फुटले आहे. कोलकाताचे क्रिकेटप्रेमी अंतिम सामना ईडन गार्डन स्टेडियम येथेच व्हावा यासाठी आग्रही आहेत आणि आंदोलन करत आहेत. बीसीसीआयने अद्याप दोन्ही क्वालिफायर मॅच (पात्रता फेरीचे सामने), एलिमिनेटर (बाद फेरीचा सामना) आणि अंतिम सामना कुठे खेळवणार हे जाहीर केलेले नाही. पण आधीच सामन्यांच्या ठिकाणांवरुन वादाला तोंड फुटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली आणि पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला. आता हा सामना नव्याने २४ मे रोजी खेळवला जाणार आहे. आधी धरमशाला येथे ८ मे रोजी झालेला सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला होता. आता २४ मे रोजी हा सामना जयपूर येथे होणार आहे.
Comments
Add Comment

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी

बंगळूरू चेंगराचेंगरी : आरसीबीसह आणखी दोघांविरोधात एफआयआर दाखल

बंगळूरू: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अखेर गुन्हा दाखल

श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका