२५० बांगलादेशींना पोलिसांनी दाखवला घरचा रस्ता

मुंबई : भारतात घुसखोरी करून मुंबईत तळ ठोकणाऱ्या बांगलादेशींवर सध्या धडक कारवाई सुरू आहे. पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसांत तब्बल २५० बांगलादेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचे समजते आहे.


एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रत्यार्पणाची कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिक मुंबईत विविध ठिकाणी बेकायदा वास्तव्य करत आहेत. त्यातील अनेक जण येथे काम करून लखपती झाल्याचेही तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असली तरी बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. अनेक बांगलादेशी भारतात स्थिर झाल्यानंतर इतर बांगलादेशी नागरिकांनाही येथे स्थायिक करण्यासाठी बेकायदा काम करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्याविरोधात एटीएस, मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.


संशयित बांगलादेशी नागरिकांचे बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवली जात आहे. याशिवाय रेशनकार्ड, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री १४५ बांगलादेशींना पाठवण्यात आले असून, त्यात ७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. त्याखालोखाल पुरुष, लहान मुले आणि तृतीयपंथींचा समावेश आहे. शुक्रवारीही १५० हून अधिक जणांना परत पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना