२५० बांगलादेशींना पोलिसांनी दाखवला घरचा रस्ता

मुंबई : भारतात घुसखोरी करून मुंबईत तळ ठोकणाऱ्या बांगलादेशींवर सध्या धडक कारवाई सुरू आहे. पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसांत तब्बल २५० बांगलादेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचे समजते आहे.


एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रत्यार्पणाची कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिक मुंबईत विविध ठिकाणी बेकायदा वास्तव्य करत आहेत. त्यातील अनेक जण येथे काम करून लखपती झाल्याचेही तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असली तरी बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. अनेक बांगलादेशी भारतात स्थिर झाल्यानंतर इतर बांगलादेशी नागरिकांनाही येथे स्थायिक करण्यासाठी बेकायदा काम करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्याविरोधात एटीएस, मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.


संशयित बांगलादेशी नागरिकांचे बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवली जात आहे. याशिवाय रेशनकार्ड, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री १४५ बांगलादेशींना पाठवण्यात आले असून, त्यात ७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. त्याखालोखाल पुरुष, लहान मुले आणि तृतीयपंथींचा समावेश आहे. शुक्रवारीही १५० हून अधिक जणांना परत पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची