मुंबईकरांच्या शनिवारची सुरुवात पावसाने

मुंबई : मुंबईकरांच्या शनिवारची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. छत्री हाती नसल्यामुळे भिजत जवळच्या आडोश्यापर्यंत पोहोचताना नागरिकांची धावपळ झाली.

हवामान विभागाने मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region or MMR) शनिवारी हलक्या सरींची शक्यता वर्तवली होती. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. पुढील पाच दिवस राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.

मुंबईत शुक्रवारी ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. पण शनिवारी सकाळीच पावसाचे आगमन झाले आणि पारा घसरला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहील. संध्याकाळी किंवा रात्री निवडक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्यची शक्यता आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे थोडा दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक