IPL 2025, RCB vs KKR: 'आयपीएल २०२५'चे रणशिंग पुन्हा फुंकले

  70

मुंबई(ज्ञानेश सावंत): दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर आयपीएल २०२५ चे सामने आजपासून सुरू होत आहेत. आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु रायडर्स यांच्यात रंगणार आहे. कोलकाता पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे त्यांच्यासाठी विजय किंवा पराभव हे जास्त गरजेचे नसले तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसाठी पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी आजचा विजय महत्त्वाचे असेल, बंगळूरुचा संघ कोलकातासमोर नक्कीच वरचढ ठरणार आहे, त्यांची फलंदाजी ही उत्तम असून ते नेहमीच आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचे प्रयत्न करीत आहेत.


आजही त्यांचा प्रयत्न हाच असेल की २००-२२५ धावसंख्या उभारून समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा. स्वतः विराट कोहली, कर्णधार पाटीदार, मयंक अग्रवाल सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत, तर गोलंदाजीमध्ये जोश हॅझलवूड, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या आहेत. आजच्या सामन्यात जोश हॅझलवूड खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. कोलकाताचा संघ ही त्याच ताकदीचा आहे, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला हा सामना सहजासहजी जिंकता येणार नाही.


अजिंक्य राहणे, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यरसारखे फलंदाज तर वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्तीसारखे गोलंदाज आहेत. पहिल्या फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कोलकाताचा ७ गडीनी पराभव केला होता. त्यामुळे बंगळूरुचे पारडे नक्कीच जड आहे. २०-२० मध्ये कधीही काहीही होऊ शकते, अगदी शेवटच्या षटकात निर्णय बदलू शकतो. चला तर बघूया आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात काय होणार आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल