IPL 2025, RCB vs KKR: 'आयपीएल २०२५'चे रणशिंग पुन्हा फुंकले

मुंबई(ज्ञानेश सावंत): दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर आयपीएल २०२५ चे सामने आजपासून सुरू होत आहेत. आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु रायडर्स यांच्यात रंगणार आहे. कोलकाता पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे त्यांच्यासाठी विजय किंवा पराभव हे जास्त गरजेचे नसले तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसाठी पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी आजचा विजय महत्त्वाचे असेल, बंगळूरुचा संघ कोलकातासमोर नक्कीच वरचढ ठरणार आहे, त्यांची फलंदाजी ही उत्तम असून ते नेहमीच आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचे प्रयत्न करीत आहेत.


आजही त्यांचा प्रयत्न हाच असेल की २००-२२५ धावसंख्या उभारून समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा. स्वतः विराट कोहली, कर्णधार पाटीदार, मयंक अग्रवाल सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत, तर गोलंदाजीमध्ये जोश हॅझलवूड, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या आहेत. आजच्या सामन्यात जोश हॅझलवूड खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. कोलकाताचा संघ ही त्याच ताकदीचा आहे, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला हा सामना सहजासहजी जिंकता येणार नाही.


अजिंक्य राहणे, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यरसारखे फलंदाज तर वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्तीसारखे गोलंदाज आहेत. पहिल्या फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कोलकाताचा ७ गडीनी पराभव केला होता. त्यामुळे बंगळूरुचे पारडे नक्कीच जड आहे. २०-२० मध्ये कधीही काहीही होऊ शकते, अगदी शेवटच्या षटकात निर्णय बदलू शकतो. चला तर बघूया आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात काय होणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत