IPL 2025, RCB vs KKR: 'आयपीएल २०२५'चे रणशिंग पुन्हा फुंकले

  79

मुंबई(ज्ञानेश सावंत): दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर आयपीएल २०२५ चे सामने आजपासून सुरू होत आहेत. आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु रायडर्स यांच्यात रंगणार आहे. कोलकाता पात्रता फेरीतून बाहेर गेल्यामुळे त्यांच्यासाठी विजय किंवा पराभव हे जास्त गरजेचे नसले तरीही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसाठी पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी आजचा विजय महत्त्वाचे असेल, बंगळूरुचा संघ कोलकातासमोर नक्कीच वरचढ ठरणार आहे, त्यांची फलंदाजी ही उत्तम असून ते नेहमीच आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचे प्रयत्न करीत आहेत.


आजही त्यांचा प्रयत्न हाच असेल की २००-२२५ धावसंख्या उभारून समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा. स्वतः विराट कोहली, कर्णधार पाटीदार, मयंक अग्रवाल सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत, तर गोलंदाजीमध्ये जोश हॅझलवूड, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या आहेत. आजच्या सामन्यात जोश हॅझलवूड खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. कोलकाताचा संघ ही त्याच ताकदीचा आहे, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला हा सामना सहजासहजी जिंकता येणार नाही.


अजिंक्य राहणे, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यरसारखे फलंदाज तर वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्तीसारखे गोलंदाज आहेत. पहिल्या फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कोलकाताचा ७ गडीनी पराभव केला होता. त्यामुळे बंगळूरुचे पारडे नक्कीच जड आहे. २०-२० मध्ये कधीही काहीही होऊ शकते, अगदी शेवटच्या षटकात निर्णय बदलू शकतो. चला तर बघूया आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात काय होणार आहे.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे