मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा ई मेल मिळाल्यापासून मुंबई पोलीस दल हाय अलर्टवर आहे. पोलिसांनी धमकीचा ई मेल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तीन - चार दिवसांत बॉम्बस्फोट होणार अशी धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. हा धमकीचा ई मेल मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाला. पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे.

सायबर पोलीस दोन्ही ई मेल प्रकरणी तपास करत आहेत. अद्याप कुठेही स्फोट झालेला नाही. पोलिसांनी दोन्ही ई मेलचा सेंडर शोधण्याचे प्रयतन सुरू केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी गस्तीत वाढ केली आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदबस्त वाढवला आहे.
Comments
Add Comment

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व

बंदर कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम - मंत्री नितेश राणे

मुंबई: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी

Maharashtra Government : महाराष्ट्रात आता ‘ड्रोन’ आणि ‘रोबोटिक्स’ची क्रांती

राज्य सरकारकडून 'स्वयंचलित प्रणाली धोरण-२०२६' जाहीर; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारनिर्मिती

Kalyan Crime : कल्याणमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; आरोपी पती अटकेत

कल्याण: शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून पतीने

Weather Update : जुलैमध्ये पाऊस येणार ? अरबी समुद्रावरील मान्सूनचे ढग गायब

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत त्यात आता अरबी समुद्रामुळे मान्सूनचे ढग गायब झाले