पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांची लगबग सुरू!

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात ६ मे २०२५ पासून ते १६ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे. शेतकरी वर्गाने पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांना सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण जून महिन्यात पडणारा पाऊस आता मे महिन्यात पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपापल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टर व जेसेबी द्वारे करताना दिसत आहे; परंतु हा मे महिन्यात पडणारा अवकाळी पाऊस शेतकरी वर्गांना जूनमध्ये भात पेरणी हंगामात दगा देतो की काय अशी चर्चा वयोवृद्ध शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे जून महिन्याऐवजी ऐन मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखा वाटत आहे.


कारण मे महिन्यासारख्या कडक उन्हाळ्यात पाऊस कदाचित एकदा किंवा दोनदा पडतो; परंतु यंदा मे महिन्यात दहा ते अकरा दिवस पाऊस पडताना दिसत आहे. अशा अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे रानमाळावर गवत उगवू लागले आहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस कसा पडणार या भीतीपोटी शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. संध्याकाळी पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात हवेतील गारवा जाणवतो परंतु सकाळी व दुपारी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवते.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे