पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांची लगबग सुरू!

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात ६ मे २०२५ पासून ते १६ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे. शेतकरी वर्गाने पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांना सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण जून महिन्यात पडणारा पाऊस आता मे महिन्यात पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपापल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टर व जेसेबी द्वारे करताना दिसत आहे; परंतु हा मे महिन्यात पडणारा अवकाळी पाऊस शेतकरी वर्गांना जूनमध्ये भात पेरणी हंगामात दगा देतो की काय अशी चर्चा वयोवृद्ध शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे जून महिन्याऐवजी ऐन मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखा वाटत आहे.


कारण मे महिन्यासारख्या कडक उन्हाळ्यात पाऊस कदाचित एकदा किंवा दोनदा पडतो; परंतु यंदा मे महिन्यात दहा ते अकरा दिवस पाऊस पडताना दिसत आहे. अशा अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे रानमाळावर गवत उगवू लागले आहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस कसा पडणार या भीतीपोटी शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. संध्याकाळी पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात हवेतील गारवा जाणवतो परंतु सकाळी व दुपारी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवते.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास

ठाणे ‘सिव्हिल’ने तरुणीला दिले नवे आयुष्य

अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण