पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांची लगबग सुरू!

  46

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात ६ मे २०२५ पासून ते १६ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे. शेतकरी वर्गाने पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांना सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण जून महिन्यात पडणारा पाऊस आता मे महिन्यात पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपापल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टर व जेसेबी द्वारे करताना दिसत आहे; परंतु हा मे महिन्यात पडणारा अवकाळी पाऊस शेतकरी वर्गांना जूनमध्ये भात पेरणी हंगामात दगा देतो की काय अशी चर्चा वयोवृद्ध शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे जून महिन्याऐवजी ऐन मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखा वाटत आहे.


कारण मे महिन्यासारख्या कडक उन्हाळ्यात पाऊस कदाचित एकदा किंवा दोनदा पडतो; परंतु यंदा मे महिन्यात दहा ते अकरा दिवस पाऊस पडताना दिसत आहे. अशा अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे रानमाळावर गवत उगवू लागले आहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस कसा पडणार या भीतीपोटी शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. संध्याकाळी पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात हवेतील गारवा जाणवतो परंतु सकाळी व दुपारी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवते.

Comments
Add Comment

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक