
नांदगाव : नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात एका खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इर्टीगा कार व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन यात निफाड तालुक्यातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींवर नांदगाव मध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या रंगाची इर्टीगा कार क्रमांक (MH ०२ E E २३०९) ही गाडी येत असताना नांदगाव कडून कासारी कडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो क्रमांक (MH ४१ A U ५३१६) ला जोरदार धडक दिली. या टेम्पोमध्ये सिमेंटच्या गोण्या भरलेल्या होत्या. या अपघातात इर्टीगा कारचा चालक वैभव वाल्मीक वैताळ (रा. निफाड) यांच्यासह अजून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळीच तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथोमापचार करून पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादा किंचित वाढल्यास दंड वसुलीत शिथिलता देण्याची महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती ...
या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५०(B), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहे.