Freight Trains : मालगाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार!

महानगरात या रेल्वेमार्गाचे काम वेगात


मुंबई : भारतातील मालवाहतुकीच्या पायाभूत सुविधांना वेग आणि चालना देण्यासाठी, मालगाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगरात या रेल्वेमार्गाचे काम वेगात सुरू आहे. नुकताच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (डीएफसीसीआयएल) वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (डब्ल्यूडीएफसी) जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण – निळजे विभागातील कळंबोली येथे ११०.५ मीटर लांबीचा आणि सुमारे १,५०० टन वजनाचा एक मोठा स्टील गर्डर यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे. कळंबोली येथे सर्वाधिक लांबींच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डरच्या उभारणीमुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.



भारतीय रेल्वे आधुनिकतेच्या दिशेने पाऊल टाकत असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणपूरक वाहतुकीकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी देशभरात मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यामध्ये पश्चिमेकडील ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट काॅरिडोर’ची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या जेएनपीटी-वैतरणा समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देशातील मालवाहतुकीसाठी २,८४३ किमी लांबीचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) हा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.


या प्रकल्पातील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) – वैतरणा विभाग महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) ट्रक, कंटेनरची रस्ते वाहतूक बंद करून रेल्वेमार्गे माल वाहतूक केली जाणार आहे. यामुळे उरण, पनवेल, कळंबोलीसह सर्व परिसरातील कंटेनर, ट्रकच्या वाहतुकीची वर्दळ कमी होणार असून प्रदूषणाला आळा बसणार आहे. डीएफसीसीआयएलने बांधलेला कळंबोली येथील रेल्वे उड्डाणपूल आतापर्यंतचा सर्वाधिक लांब पूल आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.



९ भुयारी मार्ग


वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा जेएनपीटी – वैतरणा विभाग १०३ किमीपर्यंत विस्तारला असून तो खारबाव आणि तळोजाला जेएनपीटीशी जोडतो. या विभागात ५३ मोठे पूल, २४२ लहान पूल, ३ यार्ड/स्थानक इमारती, १.१७ किमी लांबीचे बोगदे, १० उड्डाणपूल, ९ भुयारी मार्ग असणार आहेत.




मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग


भारतीय रेल्वेमध्ये २,८४३ किमी लांबीचा मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. पंजाबमधील लुधियाना आणि पश्चिम बंगालमधील डानकुनी असा पूर्व मालवाहतुकीचा मार्ग आणि उत्तर प्रदेशमधील दादरी ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी वेगळा मार्ग उपलब्ध केला आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या