चोऱ्या करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या महिलेला अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

मुंबई : मुंबई पोलिसांनी दिल्लीत राहणाऱ्या ३४ वर्षांच्या लक्ष्मी सोलंकीला अटक केली आहे. लक्ष्मीकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


मुंबईत बोरिवली स्थानकात प्रचंड गर्दी असते. बोरिवलीतून लोकल तसेच अनेक लांबच्या गाड्या सुटतात. ही सर्व माहिती घेतल्यानंतर दिल्लीच्या मलकागंज परिसरात राहणारी लक्ष्मी मुंबईत आली होती. ती एका हॉटेलमध्ये उतरली होती. या हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर लक्ष्मी बोरिवली स्थानकावर गेली होती. बोरिवली स्थानकावर असलेल्या प्रचंड गर्दीत हातचलाखी करुन लक्ष्मी चोरी करत होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी लक्ष्मीने गर्दीत हातचलाखी केली आणि ममता नावाच्या महिलेच्या पर्समधील लाखो रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी ममताच्या पतीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तक्रारदार पती आणि त्याची पत्नी यांनी दिलेली माहिती याआधारे तपास करुन लक्ष्मीला अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर लक्ष्मीने गुन्हाची कबुली दिली आणि चोरलेला माल पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी चोरलेला ऐवज जप्त केला.


ममता एका समारंभासाठी जात होती. तिच्या पर्समध्ये लाखो रुपयांचे दागिने होते. हेच दागिने लक्ष्मीने चोरले होते. पण पोलिसांनी लक्ष्मीला पकडले आणि सगळा प्रकार उघड झाला. लक्ष्मी दिल्लीत वास्तव्यास होती. पण मुंबईची माहिती मिळाल्यानंतर ती चोऱ्या करुन झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने बोरिवलीत आली होती. याआधीही लक्ष्मी चोऱ्या करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली होती. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मीला बडोद्यात पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. तिथून सुटल्यानंतर लक्ष्मीने तिच्या कारवायांचे ठिकाण बदलले होते.

Comments
Add Comment

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि