चोऱ्या करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या महिलेला अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

  39

मुंबई : मुंबई पोलिसांनी दिल्लीत राहणाऱ्या ३४ वर्षांच्या लक्ष्मी सोलंकीला अटक केली आहे. लक्ष्मीकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


मुंबईत बोरिवली स्थानकात प्रचंड गर्दी असते. बोरिवलीतून लोकल तसेच अनेक लांबच्या गाड्या सुटतात. ही सर्व माहिती घेतल्यानंतर दिल्लीच्या मलकागंज परिसरात राहणारी लक्ष्मी मुंबईत आली होती. ती एका हॉटेलमध्ये उतरली होती. या हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर लक्ष्मी बोरिवली स्थानकावर गेली होती. बोरिवली स्थानकावर असलेल्या प्रचंड गर्दीत हातचलाखी करुन लक्ष्मी चोरी करत होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी लक्ष्मीने गर्दीत हातचलाखी केली आणि ममता नावाच्या महिलेच्या पर्समधील लाखो रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी ममताच्या पतीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तक्रारदार पती आणि त्याची पत्नी यांनी दिलेली माहिती याआधारे तपास करुन लक्ष्मीला अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर लक्ष्मीने गुन्हाची कबुली दिली आणि चोरलेला माल पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी चोरलेला ऐवज जप्त केला.


ममता एका समारंभासाठी जात होती. तिच्या पर्समध्ये लाखो रुपयांचे दागिने होते. हेच दागिने लक्ष्मीने चोरले होते. पण पोलिसांनी लक्ष्मीला पकडले आणि सगळा प्रकार उघड झाला. लक्ष्मी दिल्लीत वास्तव्यास होती. पण मुंबईची माहिती मिळाल्यानंतर ती चोऱ्या करुन झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने बोरिवलीत आली होती. याआधीही लक्ष्मी चोऱ्या करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली होती. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मीला बडोद्यात पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. तिथून सुटल्यानंतर लक्ष्मीने तिच्या कारवायांचे ठिकाण बदलले होते.

Comments
Add Comment

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक

Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

मुंबई: अंकज्योतिषामध्ये प्रत्येक अंकाचे खास महत्त्व आहे. १ ते ९ अंकांचा संबंध ग्रह, राशी आणि नक्षत्रांशी जोडलेला

गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद - क्रीडा मंत्री

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच

वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाचा प्रकाश आंबेडकरांना धक्का मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी

"स्वबळाची परिक्षा होणार की नाही, पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील," गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार

"आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली," आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

मुंबई : आणीबाणीत संर्घष करणाऱ्याला स्मरणार्थ ५० वर्ष पूर्ण झालेले असून मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम