चोऱ्या करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या महिलेला अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

मुंबई : मुंबई पोलिसांनी दिल्लीत राहणाऱ्या ३४ वर्षांच्या लक्ष्मी सोलंकीला अटक केली आहे. लक्ष्मीकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


मुंबईत बोरिवली स्थानकात प्रचंड गर्दी असते. बोरिवलीतून लोकल तसेच अनेक लांबच्या गाड्या सुटतात. ही सर्व माहिती घेतल्यानंतर दिल्लीच्या मलकागंज परिसरात राहणारी लक्ष्मी मुंबईत आली होती. ती एका हॉटेलमध्ये उतरली होती. या हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर लक्ष्मी बोरिवली स्थानकावर गेली होती. बोरिवली स्थानकावर असलेल्या प्रचंड गर्दीत हातचलाखी करुन लक्ष्मी चोरी करत होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी लक्ष्मीने गर्दीत हातचलाखी केली आणि ममता नावाच्या महिलेच्या पर्समधील लाखो रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी ममताच्या पतीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तक्रारदार पती आणि त्याची पत्नी यांनी दिलेली माहिती याआधारे तपास करुन लक्ष्मीला अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर लक्ष्मीने गुन्हाची कबुली दिली आणि चोरलेला माल पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी चोरलेला ऐवज जप्त केला.


ममता एका समारंभासाठी जात होती. तिच्या पर्समध्ये लाखो रुपयांचे दागिने होते. हेच दागिने लक्ष्मीने चोरले होते. पण पोलिसांनी लक्ष्मीला पकडले आणि सगळा प्रकार उघड झाला. लक्ष्मी दिल्लीत वास्तव्यास होती. पण मुंबईची माहिती मिळाल्यानंतर ती चोऱ्या करुन झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने बोरिवलीत आली होती. याआधीही लक्ष्मी चोऱ्या करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली होती. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मीला बडोद्यात पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. तिथून सुटल्यानंतर लक्ष्मीने तिच्या कारवायांचे ठिकाण बदलले होते.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल