'भारताच्या ब्राह्मोसपुढे झुकला पाकिस्तान'

भुज : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवार १८ मे रोजी भुज येथील हवाई तळाला भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या कारवाईत ब्राह्मोस क्रुझ क्षेपणास्त्राची महत्त्वाची भूमिका होती. या ब्राह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्तान झुकला, असे संरक्षणमंत्री म्हणाले. भारतात तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस क्रुझ क्षेपणास्त्राने पाकिस्तानला रात्री दिवसा असतो तसा प्रकाश दिसू लागला; असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

भारताचे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष आहे. पाकिस्तानने दहतवाद्यांना मदत करणे थांबवले आणि दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई केली तर उत्तम. अन्यथा पाकिस्तानला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल. ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. योग्य वेळ येताच भारत पूर्ण चित्र जगाला दाखवेल; असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

माणसं नाश्ता करण्यासाठी जेवढा वेळ खर्ची घालतात तेवढ्या वेळात भारताच्या शूर सैन्याने दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला. भारताच्या शूर सैन्याने शत्रूच्या प्रदेशाला लक्ष्य करुन क्षेपणास्त्रे डागली. दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांना समजेल अशा शब्दात उत्तर दिले. भारताच्या क्षेपणास्त्रांचा आवाज फक्त पाकिस्तानलाच नाही तर पूर्ण जगाला ऐकू गेला आहे. हा आवाज फक्त क्षेपणास्त्रांचा नव्हता तर भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचाही होता.

जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट दिल्यानंतर आता संरक्षणमंत्र्यांनी भुजच्या हवाई तळाला भेट दिली आणि सैन्याचे कौतुक केले. सैनिकांनी भेटून त्यांचे अभिनंदन केले. जवानांना मिठाई भरवली. जवानांशी संवाद साधला. संरक्षणमंत्र्यांनी भूजमधील स्मृतीवन भूकंप स्मारक आणि संग्रहालयाला भेट दिली. तसेच २६ जानेवारी २००१ रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने