दहावीची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी...

राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन; नोंदणी १९ मेपासून


मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, १९ ते २८ मे दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर केंद्रीकृत प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.

विद्यार्थ्यांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. यापूर्वी ऑफलाइन अर्जासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. आता एकाच पोर्टलवरून १० कॉलेजसाठी अर्ज, दस्तऐवज अपलोड, गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी, आणि प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक मिळणार आहे.

प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत असून कोणताही गैरव्यवहार होणार नाही. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय कक्ष व हेल्पलाइन (८५३०९५५५६४) आणि support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर मार्गदर्शन उपलब्ध आहे.



प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक


विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशासाठी किमान १ आणि जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रम भरावे लागतील. जर पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात गुणांनुसार जागा मिळाली, तर तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यांना फक्त 'सर्वांसाठी खुली फेरी' या शेवटच्या फेरीतच संधी मिळेल.

Comments
Add Comment

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल