पाण्यासाठी पाकिस्तान रडकुंडीला

पाकच्या जलसंपदा मंत्रालयाने भारताला पाठवले पत्र


नवी दिल्ली/ इस्लामाबाद : भारताच्या लष्करी कारवाईमुळे दबावाखाली आलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताकडे सिंधू पाणी वाटप करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला होता.


पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी भारताच्या जल शक्ती मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून, भारताने घेतलेला निर्णय पुनर्विचारात करावा, अशी मागणी केली आहे. या पत्रात पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पाण्याविना पाकिस्तानातील शेती सुकण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच आता पाकिस्तान भारताकडे पाण्यासाठी गयावया करत आहे. दरम्यान, भारताने बगलिहार आणि सलाल धरणांतून पाणी रोखले आहे.


ऑपरेशन सिंदूर : भारताचा सर्जिकल प्रहार


७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यानंतर चार दिवस दोन्ही देशांमध्ये ड्रोन व लष्करी कारवाया झाल्या. त्यानंतर शस्त्रसंधी झाली असली तरी भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, सिंधू जलवाटप करार पुढील निर्णय होईपर्यंत स्थगितच राहील. पाण्यासाठी पाकिस्तानची अडवणूक झाली तरच दहशतवादावर तोडगा निघेल, असा सूर देशातील नागरिकांकडून आळविला जात आहे.


भारताचा निर्णायक निर्णय


२३ एप्रिल रोजी झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीत भारत सरकारने सिंधू जलवाटप करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. १९६० साली स्वाक्षरी झालेल्या या संधीनुसार भारताला सुमारे ३० टक्के आणि पाकिस्तानला उर्वरित ७० टक्के जलप्रवाह वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला देण्यात येणारे पुराचे इशारे थांबवले आहेत.


परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण


भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी मंगळवारी सांगितले होते, ‘२३ एप्रिलच्या सीसीएस बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, पाकिस्तान जेव्हा क्रॉस-बॉर्डर दहशतवादाला कायमस्वरूपी आणि विश्वासार्हपणे नकार देईल, तेव्हाच संधीबाबत पुढे विचार केला जाईल. शिवाय हवामान बदल, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानातील बदलांनी नव्या वास्तवांना जन्म दिला आहे’.

Comments
Add Comment

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार

Iran-US-Israel War : चीनकडून सर्व देशांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या आणि हॉर्मुज सामुद्रधुनीवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनने सर्व

पाकिस्तानने केला अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० लोकांचा मृत्यू २५० हून अधिक जखमी; राशिद खानकडून संताप व्यक्त

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर

होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून नाटो फुटणार, ट्रम्पचा इशारा

होर्मुज सामुद्रधुनीची सुरक्षा करण्यासाठी नाटोने मदत केली नाही तर त्यांचे भविष्य धोक्यात येईल -

आता X वर २८० कॅरेक्टरपलीकडे लिहता येणार; X च नवीन फीचर लाँच

- X वर मिळणार लांबलचक पोस्ट लिहिण्याची संधी सॅन फ्रान्सिस्को : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (Twitter) ने आता