स्वप्न साकार होणार, महामुंबईत हक्काचं घर होणार

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जागेचे दर गगनाला भिडू लागले आहेत. चांगल्या परिसरात घर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे अनेकांसाठी आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे. अशा नागरिकांचे मुंबईजवळ हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाचा कोकण विभाग सरसावला आहे. लवकरच म्हाडा कोकण विभाग घरांची सोडत काढणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचा कोकण विभाग म्हणजेच म्हाडा कोकण जुलै २०२५ मध्ये चार हजार घरांची सोडत काढण्याची तयारी करत आहे. या सोडतीतील अर्थात लॉटरीतील किमान एक हजार घरं ही ठाण्यातील चितळसर भागात आहेत. कल्याणमध्येही शेकडो घरांचा पर्याय या सोडतीमुळे उपलब्ध होणार आहे.

याआधी २०२४ मध्ये म्हाडा मुंबईची सोडत निघाली होती. आता म्हाडा कोकणची सोडत निघणार आहे. जुलै महिन्यात कोकण विभाग कल्याण आणि ठाणे शहरांसाठी सोडत जाहीर करेल. म्हाडाच्या कोकण मंडळाने गेल्या दीड वर्षात तीन सोडती काढल्या. याद्वारे सुमारे दहा हजार लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता जुलै २०२५ मध्ये म्हाडा कोकण काढणार असलेल्या सोडतीमुळे हजारो नागरिकांचे मुंबई जवळ हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

म्हाडाने महाराष्ट्रात २०२५ - २६ या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ घरे बांधण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यात मुंबईतील पाच हजार १९९ घरांचा समावेश आहे. यामुळे घर खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत लोकांना दिलासा मिळण्यास मदत होईल. म्हाडा कोकणात नऊ हजार ९०२, पुण्यात १८३६, नागपूरमध्ये ६९२, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६०८, नाशिकमध्ये ९१, अमरावतीत १६९ घरे बांधण्याचे उद्दीष्ट डोळ्यांपुढे ठेवून काम करत आहे. म्हाडाने मुंबईतील घरांसाठी ५७४९.४९ कोटी, कोकणातील घरांसाठी १४०८.८५ कोटी, पुण्यातील घरांसाठी ५८५, नागपूरच्या घरांसाठी १००९ कोटी, छत्रपती संभाजीनगरमधील घरांसाठी ६५.९६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Comments
Add Comment

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता 'मकोका' लागणार!

गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी; बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी संयुक्त भरारी पथके आणि सीमांवर

वरिष्ठांनी भाजपसोबत जायचे ठरवल्यास दुसरा पर्याय निवडेन!

आ. रोहित पवार यांचा दावा; आजोबा आणि आत्याला दिला इशारा मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंकडून २०२९ साठी स्वबळाची चाचपणी?

२०० मतदारसंघात संघटनात्मक बांधणी सुरू; मंत्री उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई :