मेट्रो प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या शहरांसाठी ज्या मेट्रो प्रकल्पांचे काम २०१४ ते २०१९ दरम्यान सुरू करण्यात आले त्या प्रकल्पांना २०२७ अखेर पर्यंत पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो ९ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीवेळी ते बोलते होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मिरा-भाईंदरपासून पुढे विरारपर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना विरारपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.


पालघर येथील वाढवण बंदर बुलेट ट्रेनने जोडले जाणार आहे. बंदराला मेट्रोने ही कसे जोडते येईल, यासाठी विचार सुरू आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले. मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या सेवेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चाचणी सुरू असलेल्या मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रोमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला महायुती सरकारने २०१८ मध्ये मंजुरी दिली. मात्र, त्यानंतर स्थगिती सरकारमुळे मेट्रो कामाला मधल्या काळात ब्रेक लागला होता. आता पुन्हा आमचे सरकार येताच, आम्ही मेट्रो कामातील स्पीड ब्रेकर काढून टाकला; असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव यांना नाव न घेता टोला लगावला.

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

१५ दिवसांत तोडगा न निघाल्याने जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा

सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी