Indian Army killed Terrorists: शोपियाननंतर आता पुलवामाच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात आज. गुरुवारी पहाटे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार झालेत. त्राल भागातील नादिर गावात झालेल्या चकमकीत आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वणी आणि यावर अहमद भट हे 3 दहशतवादी (Indian Army killed Terrorists) ठार झालेत.


दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज, गुरुवारी पहाटे भारतीय सैन्य, जम्मू- काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्तरित्या नादर, त्राल, अवंतीपोरा येथे घेराबंदी आणि शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान सतर्क जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनंतर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला आणि त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युतर दिले.


यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये 48 तासांतील ही दुसरी चकमक आहे. शोपियान जिल्ह्यातील केलर भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर आज, गुरुवारी त्राल येथे ही चकमक घडली.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला