Indian Army killed Terrorists: शोपियाननंतर आता पुलवामाच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात आज. गुरुवारी पहाटे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार झालेत. त्राल भागातील नादिर गावात झालेल्या चकमकीत आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वणी आणि यावर अहमद भट हे 3 दहशतवादी (Indian Army killed Terrorists) ठार झालेत.


दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज, गुरुवारी पहाटे भारतीय सैन्य, जम्मू- काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्तरित्या नादर, त्राल, अवंतीपोरा येथे घेराबंदी आणि शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान सतर्क जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनंतर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला आणि त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युतर दिले.


यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये 48 तासांतील ही दुसरी चकमक आहे. शोपियान जिल्ह्यातील केलर भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर आज, गुरुवारी त्राल येथे ही चकमक घडली.

Comments
Add Comment

Israel - Iran War : भारतीय दूतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील

National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या