इस्रायलचा गाझा पट्टीवर भीषण हवाई हल्ला; ६० पेक्षा अधिक नागरिक मृत, २२ बालकांचा दुर्दैवी अंत

इस्रायल : गाझा पट्टी पुन्हा एकदा रणभूमी झाली आहे. इस्रायलने शनिवारी (१० मे) गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले, ज्यात किमान ६० नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये २२ लहान मुलांचाही समावेश आहे. जबालिया भागात झालेल्या हल्ल्यात इंडोनेशियन स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात हानी झाली असून अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.


या हल्ल्याआधी शुक्रवारी रात्री इस्रायली हवाई दलाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्नसाठा असलेल्या इमारतीवरही हल्ला केला होता. गाझामधील मदतीच्या हालचालींवर इस्रायलने कडक नाकेबंदी लागू केल्यामुळे हजारो नागरिक अन्न-पाण्याविना अडचणीत आले आहेत. अनेक मदत केंद्रे बंद करण्यात आली असून परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.



इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की, "गाझामधील युद्ध थांबवण्याचा विचारही करता येणार नाही." त्यांच्या या वक्तव्यानंतर इस्रायल-हमास यांच्यातील शस्त्रसंधीची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने या हल्ल्यांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


युद्धाच्या या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानही शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे तणाव वाढतोय, तर रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. अशा तिहेरी संघर्षाच्या छायेत जग पुन्हा एका मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं आहे.


मानवाधिकार संघटनांनी इस्रायलच्या कारवायांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. गाझाला अन्न व औषधांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे ही उपासमारीची शस्त्रनीती असल्याचं सांगत या कृतीला युद्ध गुन्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनीही इस्रायलच्या कारवायांवर आक्षेप घेतला आहे.


दरम्यान, इस्रायलचा दावा आहे की हे सर्व हल्ले हमासवर दबाव टाकण्यासाठी करण्यात येत आहेत, जेणेकरून ते ओलिसांची सुटका करतील आणि शस्त्र सोडतील. पण प्रश्न असा आहे की, या युद्धाच्या पेटलेल्या भट्टीत निरपराध नागरिकांचे बळी कधीपर्यंत जात राहणार?

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल