इस्रायलचा गाझा पट्टीवर भीषण हवाई हल्ला; ६० पेक्षा अधिक नागरिक मृत, २२ बालकांचा दुर्दैवी अंत

इस्रायल : गाझा पट्टी पुन्हा एकदा रणभूमी झाली आहे. इस्रायलने शनिवारी (१० मे) गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले, ज्यात किमान ६० नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये २२ लहान मुलांचाही समावेश आहे. जबालिया भागात झालेल्या हल्ल्यात इंडोनेशियन स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात हानी झाली असून अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.


या हल्ल्याआधी शुक्रवारी रात्री इस्रायली हवाई दलाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्नसाठा असलेल्या इमारतीवरही हल्ला केला होता. गाझामधील मदतीच्या हालचालींवर इस्रायलने कडक नाकेबंदी लागू केल्यामुळे हजारो नागरिक अन्न-पाण्याविना अडचणीत आले आहेत. अनेक मदत केंद्रे बंद करण्यात आली असून परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.



इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की, "गाझामधील युद्ध थांबवण्याचा विचारही करता येणार नाही." त्यांच्या या वक्तव्यानंतर इस्रायल-हमास यांच्यातील शस्त्रसंधीची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने या हल्ल्यांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


युद्धाच्या या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानही शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे तणाव वाढतोय, तर रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. अशा तिहेरी संघर्षाच्या छायेत जग पुन्हा एका मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं आहे.


मानवाधिकार संघटनांनी इस्रायलच्या कारवायांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. गाझाला अन्न व औषधांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे ही उपासमारीची शस्त्रनीती असल्याचं सांगत या कृतीला युद्ध गुन्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनीही इस्रायलच्या कारवायांवर आक्षेप घेतला आहे.


दरम्यान, इस्रायलचा दावा आहे की हे सर्व हल्ले हमासवर दबाव टाकण्यासाठी करण्यात येत आहेत, जेणेकरून ते ओलिसांची सुटका करतील आणि शस्त्र सोडतील. पण प्रश्न असा आहे की, या युद्धाच्या पेटलेल्या भट्टीत निरपराध नागरिकांचे बळी कधीपर्यंत जात राहणार?

Comments
Add Comment

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१