Mango: आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का ?

मुंबई: आंबा, त्यातच हापूस आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. आंबा पाहिला की त्याचा आस्वाद घ्यावासा वाटतो. मात्र आजकाल मधुमेही रुग्णांमध्ये वाढ होतेय. आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का ? आंबा जेवणापूर्वी खावा की जेवल्यानंतर खावा, पाहूयात


सध्या आंब्याचा सीझन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपल्बध आहेत. कोकणातून हापूस आंबेही पाठवले जात आहेत. मात्र आंबा गोड असल्याने तो खाल्ल्यास शरीरातील साखर वाढते का, असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यातच मधुमेहींना हा प्रश्न जास्त पडलाय.


खरं तर आंब्यात साखर असते ती नैसर्गिक स्वरुपाची. त्यामुळे आंबा खाल्ल्याने आंब्यातील नैसर्गिक साखर ही शरीराला पोषक घटक पुरवते. यामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश आहे. त्यामुळे आहारात आंब्याचा समावेश करता येऊ शकतो.


http://prahaar.in/2025/05/14/attack-on-kirana-hills-after-indias-operation-sindoor-mysterious-confusion-over-nuclear-energy-in-pakistan/

 

आंब्याचा आहारात समावेश केला, तरी त्याचं प्रमाण योग्य असावं. आपल्या रक्तातील साखर किती आहे हे लक्षात घेऊन आंबा खावा. रक्तातील साखरेचं प्रमाम जास्त असेल तर एक-दोन आंबे खाण्याऐवजी आंब्याचे एकाद दुसरं काप खावं. आंबा कितीही आवडीचा असला तरी उपाशीपोटी खाणं टाळावा. कारण आंब्यात असलेली नैसिर्गिक साखर रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नाश्त्यावेळी आंबा खाण्याची इच्छा झाली तर त्याबरोबर अन्य काही पदार्थांचा समावेश करावा. जेवण केल्यानंतर आंबा खाल्ल्यास कॅलरीजही वाढू शकतात.


आंब्यापेक्षा कैरी खाल्ल्यास जास्त उपयुक्त ठरू शकतं. कैरीमुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहू शकते. आहारात कैरीच्या पन्ह्याचा आवर्जून वापर करा. काहीही असो कोणतीही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे आंब्याचा आस्वाद जरुर घ्या, मात्र शरीरातील साखर सांभाळा.




Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी