मुंबई, बंगळूरु, गुजरातसह ६ आयपीएल संघांना धक्का

आफ्रिकेने आपल्या खेळाडूंना परत बोलावले


नवी दिल्ली : आयपीएल २०२५ चा हंगाम पुन्हा एकदा सुरू होत आहे, त्याची सुरुवात १७ मे रोजी बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामन्याने होणार आहे. अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. पण त्याआधी क्रिकेट साऊथ आफ्रिकेने एक धक्का दिला आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना २६ मे पर्यंत परतण्यास सांगितले आहे. यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या मुंबई इंडियन्स, आरसीबी, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्जसह ६ संघांचे नुकसान होणार आहे.


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ ते १५ जून दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकेने संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी २६ मेपर्यंत परत येण्याचे निर्देश दिले आहेत. आयपीएल २०२५ मध्ये २० दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू वेगवेगळ्या संघांशी संबंधित आहेत. परंतु यापैकी ८ खेळाडू असे आहेत, जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाचा भाग आहेत. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता; परंतु भारत-पाकिस्तान तणावामुळे तो थांबवण्यात आला. आता अंतिम फेरीची तारीख ३ जून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आफ्रिकेचे खेळाडू २६ तारखेलाच संघात परतणार आहेत.


कॉर्बिन बॉश (मुंबई इंडियन्स), रायन रिकेल्टन (मुंबई इंडियन्स), वियान मुल्डर (सनरायझर्स हैदराबाद), मार्को जॅन्सन (पंजाब किंग्ज), एडेन मार्क्रम (लखनऊ सुपर जायंट्स), लुंगी एनगिडी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), कागिसो रबाडा (गुजरात टायटन्स) आणि ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स)चा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम संघात समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत