जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या

२४ गावांतील ६१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा


रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या ३ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. असे असले तरी गावांमध्ये पाणीटंचाईची वाढतच आहे. सध्या पाणीटंचाईच्या वाड्यांनी अर्धशतक पार केले आहे. अवकाळी पाऊस पडत असला तरीही त्याचा जिल्ह्यातील पाणीटंचाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यातील २४ गावातील ६१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्याचा फायदा १५ हजार ४७३ लोकांना होत आहे.


सर्वाधिक टंचाई तीव्रता रत्नागिरी तालुक्यात जाणवत आहे. तर गुहागर, दापोली, लांजा व राजापूर या चार तालुक्यांत प्रशासनाला अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागलेला नाही. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर आहे. आर्द्रतेमुळे उन्हाची काहिली अधिक जाणवत आहे. या परिस्थितीमुळे नद्या, नाल्यांमधील पात्र कोरडी पडलेली आहेत. विहिरींची पाणीपातळीही खालावली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावाच्या एका बाजूला डोंगरावर असलेल्या वाड्यांपर्यंत शासनाच्या जलजीवन मिशनमधील योजना अजूनही पोहोचलेल्या नाहीत. पाणीपुरवठ्याचे स्रोत नसल्यामुळे तिथे नळपाणी योजना राबवण्याचे आव्हानच आहे.



खेड, चिपळूण तालुक्यात ही परिस्थिती अधिक आहे. त्यामध्ये दहाहून अधिक धनगरवाड्यांचा समावेश आहे. येथील काही लोकांनी पाणी नसल्यामुळे स्थलांतर केले आहे, तर रत्नागिरी तालुक्यात खाडीकिनारी भागात मचूळ पाणी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. यावर अजूनही प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही. तालुक्यात शिरगाव, नाचणे, सडामिऱ्या, सोमेश्वर, खेडशी, केळ्ये, कासारवेली या परिसरातील नागरिकांना टँकरने पाणी दिले
जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची