कोकणातील सुरक्षित किनाऱ्यांचे कासवांना आकर्षण

बहुसंख्य माद्यांचा समुद्र किनारी मुक्काम


रत्नागिरी : गेल्या दोन वर्षात दापोली, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांमधील सागर किनाऱ्यांवर कासवे मोठ्या प्रमाणावर येऊन मुक्काम करू लागली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात येथील किनाऱ्यांवर कासवांची घरटी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत. कोकणातील सुरक्षित समुद्र किनाऱ्यांमुळेच कासवांची पावले या ठिकाणी वळली असावीत.


ओडिशा येथे साधारणपणे १९७० च्या सुमारास कासवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. यातूनच कासवांना फ्लिपर मेटल टॅग लावण्यात आले. आतापर्यंत ओडिशामध्ये टॅग केलेल्या कासवांपैकी बहुसंख्य कासव तामिळनाडूच्या गल्फ ऑफ मन्नारपर्यंत आणि श्रीलंकेपर्यंत गेली आहेत. यातील बहुसंख्य माद्या त्याच भागात परत अंडी घालण्यासाठी आल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.



वनविभाग, कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रथमच महाराष्ट्रात सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये गुहागर येथे सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवलेली ‘बागेश्री’ सात महिन्यात अरबी समुद्रातून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, कन्याकुमारी ते श्रीलंकेपर्यंत पाच हजार किलोमीटर फिरल्याची नोंद आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी गुहागर येथे नेमलेल्या कासव मित्रांना एका मादीला ०३२३३ क्रमांकाचा लावलेला फ्लिपर टॅग आढळला. तपासाअंती या मादीला १८ मार्च २०२१ रोजी ओडिशा येथे फ्लिपर टॅग केल्याची नोंद आढळली. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ही मादी गुहागर समुद्रकिनारी सुमारे ३५०० किलोमीटर प्रवास करून अंडी घालण्यासाठी आली होती. या वर्षीही रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मिळून ६४ माद्यांना टॅगिंग करण्यात आले आहे.


कासवांचा स्थलांतर पॅटर्न, अधिवासाची निवड, खाद्याची उपलब्धता, वातावरणातील बदल, जागतिक तापमान वाढ आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित ठिकाणे आदी अनेक घटक याला कारणीभूत असू शकतात, अशा अनेक बाबी कासवांच्या स्थलांतराविषयी अभ्यासकांकडून नोंदविण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह