पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारूचा कहर, १४ जणांचा मृत्यू, ६ जणांची स्थिती गंभीर

अमृतसर: पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची स्थिती गंभीर आहे. यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरण हे मजीठाच्या मडई गाव तसेच भागली गावातील आहे. दरम्यान, पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, अमृतसर जिल्ह्याच्या मजीठाच्या मडई गाव आणि भागली गावात विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची स्थिती गंभीर आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांचे शव हाती घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


 


या नकली दारू नेटवर्कचा तपास केला जात आहे. सरकारने दारू माफियांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की विषारी दारूच्या सेवनाने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांची स्थिती गंभीर आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे