पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारूचा कहर, १४ जणांचा मृत्यू, ६ जणांची स्थिती गंभीर

अमृतसर: पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची स्थिती गंभीर आहे. यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरण हे मजीठाच्या मडई गाव तसेच भागली गावातील आहे. दरम्यान, पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, अमृतसर जिल्ह्याच्या मजीठाच्या मडई गाव आणि भागली गावात विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची स्थिती गंभीर आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांचे शव हाती घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


 


या नकली दारू नेटवर्कचा तपास केला जात आहे. सरकारने दारू माफियांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की विषारी दारूच्या सेवनाने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांची स्थिती गंभीर आहे.

Comments
Add Comment

'तेल खरेदीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही'

रशियाकडून खरेदीबाबत भारत ठाम नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जिथे मिळेल तिथून कमीत कमी किमतीत तेल खरेदी करेल.

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण