पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यपन मृतावस्थेत आढळले

श्रीरंगपट्टन : कर्नाटकमधील प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह श्रीरंगपट्टनच्या साई आश्रमाजवळील कावेरी नदीत आढळला.


अय्यप्पन पत्नीसह म्हैसूरच्या विश्वेश्वरा नगर औद्योगिक क्षेत्रात राहत होते. ते ७ मे पासून बेपत्ता होते. घरच्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलीस तपास सुरू असताना नदीतून वाहत एक मृतदेह किनाऱ्यालगत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह बघून पोलिसांनी अय्यप्पन कुटुंबाशी संपर्क साधला. अय्यप्पन कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह बघून ओळख पटवली. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.


पोलिसांनी पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यपन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपास सुरू केला आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांनी आत्महत्या केली की त्यांना कोणीतरी पाण्यात ढकलून दिले याचा तपास पोलीस करत आहेत.


डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांनी मत्स्यव्यवसायात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले होते. राष्ट्रीय स्तरावर अनेक उच्च पदांवर काम केले होते. भारताच्या नीलक्रांतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन २०२२ मध्ये गौरव करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या