मुंबईत सावध मोटरमनमुळे रेल्वेचा अपघात टळला

मुंबई : मोटरमनच्या सावधगिरीमुळे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचा अपघात टळला. गाडी स्टेशनवर येत होती त्याचवेळी प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्याचे स्वयंचलित यंत्र रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. पण यंत्र कोसळले असताना गाडी नेहमीप्रमाणे विशिष्ट वेगात स्टेशनवर आली असती तर अपघात झाला. गाडी आणि रुळावर पडलेले यंत्र यांच्या धडकेमुळे अनर्थ झाला असता. पण मोटरमनला रुळांवर एक अवजड वस्तू पडल्याचे लांबून लक्षात आले आणि त्याने गाडीचा वेग झपाट्याने कमी केला. गाडी थांबवली. यामुळे स्टेशनवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना रुळांवर पडलेले यंत्र हटवण्यासाठी थोडा वेळ मिळाला आणि पुढचा अनर्थ टळला. रुळांवर पडलेले यंत्र हटवणे शक्य व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सातची रेल्वे वाहतूक थोडा वेळ बंद करण्यात आली होती.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने