मुंबईत सावध मोटरमनमुळे रेल्वेचा अपघात टळला

  84

मुंबई : मोटरमनच्या सावधगिरीमुळे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचा अपघात टळला. गाडी स्टेशनवर येत होती त्याचवेळी प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्याचे स्वयंचलित यंत्र रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. पण यंत्र कोसळले असताना गाडी नेहमीप्रमाणे विशिष्ट वेगात स्टेशनवर आली असती तर अपघात झाला. गाडी आणि रुळावर पडलेले यंत्र यांच्या धडकेमुळे अनर्थ झाला असता. पण मोटरमनला रुळांवर एक अवजड वस्तू पडल्याचे लांबून लक्षात आले आणि त्याने गाडीचा वेग झपाट्याने कमी केला. गाडी थांबवली. यामुळे स्टेशनवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना रुळांवर पडलेले यंत्र हटवण्यासाठी थोडा वेळ मिळाला आणि पुढचा अनर्थ टळला. रुळांवर पडलेले यंत्र हटवणे शक्य व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सातची रेल्वे वाहतूक थोडा वेळ बंद करण्यात आली होती.

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली