मुंबईत सावध मोटरमनमुळे रेल्वेचा अपघात टळला

मुंबई : मोटरमनच्या सावधगिरीमुळे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचा अपघात टळला. गाडी स्टेशनवर येत होती त्याचवेळी प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्याचे स्वयंचलित यंत्र रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. पण यंत्र कोसळले असताना गाडी नेहमीप्रमाणे विशिष्ट वेगात स्टेशनवर आली असती तर अपघात झाला. गाडी आणि रुळावर पडलेले यंत्र यांच्या धडकेमुळे अनर्थ झाला असता. पण मोटरमनला रुळांवर एक अवजड वस्तू पडल्याचे लांबून लक्षात आले आणि त्याने गाडीचा वेग झपाट्याने कमी केला. गाडी थांबवली. यामुळे स्टेशनवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना रुळांवर पडलेले यंत्र हटवण्यासाठी थोडा वेळ मिळाला आणि पुढचा अनर्थ टळला. रुळांवर पडलेले यंत्र हटवणे शक्य व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सातची रेल्वे वाहतूक थोडा वेळ बंद करण्यात आली होती.

Comments
Add Comment

आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश मुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये

महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला

मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार मुंबई :

‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.