काश्मीर हा भारताचाच भाग आहे; कुठलीही मध्यस्थी मान्य नाही; भारताने पाकिस्तानला ठणकावले

भारताची ठाम भूमिका – तिसऱ्या पक्षाची गरज नाही, काश्मीर आमचाच!


नवी दिल्ली : “काश्मीर हे भारताचे केंद्रशासित क्षेत्र आहे आणि त्यावर कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीला भारत संमती देणार नाही,” अशा ठाम शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा जगाला भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानच्या अलीकडील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले की, “भारत आणि पाकिस्तानमधील सर्व प्रश्न हे केवळ द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जातील.”


जयस्वाल म्हणाले, “दहशतवाद पोसणाऱ्या देशाला वाटतं की तो यातून मोकळा होईल, तर ती भ्रमाची दुनिया आहे. भारताने नष्ट केलेली दहशतवादी केंद्रे ही जगभरातील निष्पाप लोकांच्या मृत्यूस जबाबदार होती. पाकिस्तानने हे जितकं लवकर समजून घेतलं, तितकं चांगलं!”


ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणं हाच खरा मुद्दा आहे. आम्ही कोणत्याही दबावाला किंवा हस्तक्षेपाला भीक घालत नाही.”


दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या चर्चांमध्ये व्यापाराचा कोणताही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू