विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!

  79

१४ वर्षांच्या दमदार प्रवासाला भावनिक पूर्णविराम


मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा करताना ३६ वर्षीय कोहलीने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी प्रवासातल्या आठवणींना उजाळा दिला. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली असून, कोट्यवधी चाहत्यांमध्ये निराशेची लाट उसळली आहे.



भावनिक निरोप


"माझं मन कृतज्ञतेच्या ओलाव्यानं भरून आलंय. कसोटी क्रिकेटने मला आयुष्यात अनमोल क्षण दिले. मी या खेळाला सर्व काही दिलं आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा अधिक परत दिलं," अशी भावनात्मक प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली. संघसहकाऱ्यांपासून प्रशिक्षकांपर्यंत सर्वांचा त्याने विशेष उल्लेख केला.





कसोटीतील १४ वर्षांचा सुवर्णप्रवास


२०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या कोहलीने एकूण १२३ कसोटी सामने खेळले आणि ९,२३० धावा केल्या. ४६.८५ ची सरासरी, ३० शतके, ३१ अर्धशतके हे आकडे त्याच्या कारकिर्दीचा ठसा उमठवतात.



कर्णधार म्हणून सर्वोच्च यश


२०१४ ते २०२२ या काळात कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व करत ६८ सामने खेळवले. यापैकी ४० विजय मिळवत त्याने भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार होण्याचा मान पटकावला.



शेवटचा कसोटी सामना


कोहलीने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळला. त्या सामन्यात त्याच्या फलंदाजीला चमकदार शेवट मिळाला नाही – पहिल्या डावात १७, दुसऱ्या डावात केवळ धावा.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी




  • कसोटी: १२३ सामने | ९२३० धावा | ४६.८५ सरासरी | ३० शतके | ३१ अर्धशतके




  • वनडे: ३०२ सामने | १४१८१ धावा | ५७.८८ सरासरी | ५१ शतके | ७४ अर्धशतके




  • टी-२०: १२५ सामने | ४१८८ धावा | ४८.६९ सरासरी | १ शतक | ३८ अर्धशतके








टी-२०नंतर कसोटीलाही रामराम; वन-डेबाबत निर्णय बाकी


कोहलीने यापूर्वीच २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हणत त्याने आणखी एक पर्व संपवलं. मात्र सध्या वन-डे क्रिकेटबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही.



एक पर्व संपलं… विराट आठवणी कायम!


विराट कोहलीने केवळ आकडे नव्हे, तर अनोख्या नेतृत्वशैलीने, मैदानावरील जोशाने आणि क्रिकेटविषयीच्या निष्ठेने संपूर्ण पिढी घडवली. त्याचा कसोटी क्रिकेटमधून घेतलेला निरोप म्हणजे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा शेवट आहे.



संबंधित बातम्या...


रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त


विराट कसोटी क्रिकेटमधून का घेतोय निवृत्ती

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल