विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!

१४ वर्षांच्या दमदार प्रवासाला भावनिक पूर्णविराम


मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा करताना ३६ वर्षीय कोहलीने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी प्रवासातल्या आठवणींना उजाळा दिला. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली असून, कोट्यवधी चाहत्यांमध्ये निराशेची लाट उसळली आहे.



भावनिक निरोप


"माझं मन कृतज्ञतेच्या ओलाव्यानं भरून आलंय. कसोटी क्रिकेटने मला आयुष्यात अनमोल क्षण दिले. मी या खेळाला सर्व काही दिलं आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा अधिक परत दिलं," अशी भावनात्मक प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली. संघसहकाऱ्यांपासून प्रशिक्षकांपर्यंत सर्वांचा त्याने विशेष उल्लेख केला.





कसोटीतील १४ वर्षांचा सुवर्णप्रवास


२०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या कोहलीने एकूण १२३ कसोटी सामने खेळले आणि ९,२३० धावा केल्या. ४६.८५ ची सरासरी, ३० शतके, ३१ अर्धशतके हे आकडे त्याच्या कारकिर्दीचा ठसा उमठवतात.



कर्णधार म्हणून सर्वोच्च यश


२०१४ ते २०२२ या काळात कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व करत ६८ सामने खेळवले. यापैकी ४० विजय मिळवत त्याने भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार होण्याचा मान पटकावला.



शेवटचा कसोटी सामना


कोहलीने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळला. त्या सामन्यात त्याच्या फलंदाजीला चमकदार शेवट मिळाला नाही – पहिल्या डावात १७, दुसऱ्या डावात केवळ धावा.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी




  • कसोटी: १२३ सामने | ९२३० धावा | ४६.८५ सरासरी | ३० शतके | ३१ अर्धशतके




  • वनडे: ३०२ सामने | १४१८१ धावा | ५७.८८ सरासरी | ५१ शतके | ७४ अर्धशतके




  • टी-२०: १२५ सामने | ४१८८ धावा | ४८.६९ सरासरी | १ शतक | ३८ अर्धशतके








टी-२०नंतर कसोटीलाही रामराम; वन-डेबाबत निर्णय बाकी


कोहलीने यापूर्वीच २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हणत त्याने आणखी एक पर्व संपवलं. मात्र सध्या वन-डे क्रिकेटबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही.



एक पर्व संपलं… विराट आठवणी कायम!


विराट कोहलीने केवळ आकडे नव्हे, तर अनोख्या नेतृत्वशैलीने, मैदानावरील जोशाने आणि क्रिकेटविषयीच्या निष्ठेने संपूर्ण पिढी घडवली. त्याचा कसोटी क्रिकेटमधून घेतलेला निरोप म्हणजे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा शेवट आहे.



संबंधित बातम्या...


रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त


विराट कसोटी क्रिकेटमधून का घेतोय निवृत्ती

Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)