‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी! भारताची ‘तयारी पाहून’ पाकिस्तान हादरला; तीनही दलांचा पाकिस्तानला खणखणीत इशारा

नवी दिल्ली : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांवर तुफान हल्ला चढवत पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. यावेळी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन करताना स्पष्ट केले की, “भारत सज्ज आहे... आणि गरज भासली तर पुन्हा हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही!”


एअर मार्शल ए. के. भारती यांनी स्पष्टपणे सांगितले, “आपली लढाई पाकिस्तानशी नव्हे, तर दहशतवाद्यांशी आहे. पण पाकिस्तानने त्यांना पाठीशी घालून ही लढाई स्वतःवर घेतली आणि आता त्याला त्याची किंमत मोजावी लागेल.”


भारतीय लष्कराने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तानने पाठवलेले ड्रोन उद्ध्वस्त केले. त्यानंतर ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि दहशतवादी तळांवर हल्ला करून भारताने आपली सैन्यताकद दाखवून दिली. “पाकिस्तानचे पाप पहलगामपर्यंत भरले होते... आता त्याचा शेवट झाला आहे,” असे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.


भारतीय नौदलानेही एकाच वेळी हवाई, जमीन व समुद्रातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवत पाकिस्तानचे प्रयत्न निष्फळ ठरवले. “सर्व सिस्टम आणि लष्करी तळ पुढील मोहिमेसाठी सज्ज आहेत,” असा कडक इशाराच व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी दिला.



“एअर डिफेन्स सिस्टम अभेद्य आहे. पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्रे फसली आणि आमच्या एकाही तळावर धक्का लागू दिला नाही,” अशी माहिती देत एअर मार्शल भारती यांनी ऑपरेशन सिंदूरचे फोटो व व्हिडिओही दाखवले.


लेफ्टनंट जनरल घई यांनी म्हटले की, मी बीएसएफ जवानांचेही कौतुक करेल. कारण, जागता पहारा देणारे जवान या मोहिमेत मोठ्या हिंमतीने आमच्यासोबत उभे राहिले, त्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा नायनाट करण्यात आला.


शेवटी लेफ्टनंट जनरल घई यांनी "जब हौसले बुलंद हों, तो मंजिलें भी कदम चूमती हैं..." अशी शायरी करत जवानांच्या शौर्याला सलाम केला.

Comments
Add Comment

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर