स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या नेपाळ क्रिकेट संघाची घोषणा

रोहितकडे कर्णधार पदाची जबाबदारी


नवी दिल्ली : नेपाळ क्रिकेट बोर्डाने स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित पौडेल हा नेपाळचे नेतृत्व करणार आहे. तसेच या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी दीपेंद्र सिंग आयरी याच्याकडे देण्यात आली आहे. नेपाळ क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली आहे. नेपाळ टीम स्कॉटलँड दौऱ्याआधी इंग्लंडमध्ये सराव सामने खेळणार आहे. नेपाळ क्रिकेट टीम १६ ते ३१ मे दरम्यान ६ सराव सामने खेळणार आहे. तसेच नेपाळ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेत नेदरलँड्स आणि स्कॉटलंड विरुद्ध प्रत्येकी २-२ सामने खेळणार आहे. तसेच नेपाळ टीम लीग २ स्पर्धेनंतर टी-२० ट्राय सीरिजसाठी स्कॉटलँडमध्ये थांबणार आहे.



नेपाळ क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या संघात रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, कुशल भुरटेल, अनिल कुमार साह, भीम शार्की, आरिफ शेख, बसीर अहमद, गुलशन कुमार झा, दीपेंद्र सिंग आयरी, संदीप लामिछाने, सोमपाल कामी, करण केसी, ललित नारायण राजबंशी, नंदन यादव आणि रिजन ढकल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण